शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

महापुरानंतर भरपाईबरोबरच पंचनाम्यातही काटछाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST

दत्ता पाटील म्हाकवे : महापुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

दत्ता पाटील

म्हाकवे : महापुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. २०१९ पेक्षाही यंदा नुकसानीचे प्रमाण वाढले असताना शासनाकडून भरपाई मात्र तुटपुंजी दिली जात आहे. नुकसानीचे पंचनामे करतानाही अनेक शेतकऱ्यांचे त्यांच्या संपूर्ण क्षेत्रातील पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले असताना अधिकारी ९० टक्क्यांपर्यंतच नुकसान झाल्याच्या नोंदी करत आहेत. याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यंदाही २०१९प्रमाणेच भरपाई मिळावी, अशीही मागणी होत आहे.

वेदगंगा नदीकाठ निढोरीपासून चिखलीपर्यंत सपाट भाग आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे पुराने प्रचंड नुकसान होते. यंदा चिकोत्रा खोऱ्यातही प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे उथळ असणाऱ्या चिकोत्रा नदीलाही पूर आला. नानीबाई चिखली येथील संगमाजवळ चिकोत्राच्या पाण्याने वेदगंगेचा प्रवाहच रोखून धरला होता. परिणामी पाण्याची फूग पश्चिमेकडील सपाट भागात वाढत गेली. त्यामुळे चिखलीसह म्हाकवे, परिसरातील गावाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे सध्या पंचनामे सुरू आहेत. मात्र, पिकांचे पूर्णतः नुकसान होऊनही अधिकारी ९०टक्क्यांपर्यंतच भरपाईसाठी क्षेत्र पात्र धरत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत.

एकराला दोन गुंठयांची भरपाई...

यंदा उसाला प्रतिगुंठा १३५ म्हणजेच एकरी ५४००रुपये व भात, सोयाबीन पिकाला प्रतिगुंठा ६८ रुपये म्हणजेच एकरी २७२०रुपये इतकी तुटपुंजी भरपाई मिळणार आहे. ही भरपाई जाहीर करतानाही शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचे जाणकरांतून बोलले जात आहे.

"आमच्या१५७३ या गट नंबरातील संपूर्ण ३८गुंठे ऊसक्षेत्राचे नुकसान झाले. मात्र, केवळ ३०गुंठेच भरपाईसाठी पात्र धरले. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी थांबायला हवी, तसेच २०१९ प्रमाणे भरपाई मिळाली तरच आम्हाला हातभार लागणार आहे.’’ -

विनोद मारुती जगदाळे

शेतकरी, बानगे

कँप्शन :

पुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पूर्णतः नुकसान झालेले आणूर येथील ऊसक्षेत्र...

छाया-दत्तात्रय पाटील, म्हाकवे.