शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ; सतेज पाटील यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 17:57 IST

३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ

कोल्हापूर : सत्तेवर येताच शासनाने राज्यातील आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील ५७ हजार १९६ शेतकऱ्यांना ३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे दिली.

छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनी मुख्य शासकिय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर वकील सूरमंजिरी लाटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पूरपरिस्थितीत कोल्हापूरकरांनी जो संयम आणि धैर्य दाखविले त्यांच्या वृत्तीला मी सलाम करत असल्याचे सांगितले.  एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी  लवकरच नवीन योजना जाहीर करण्याचा शासनाचा मानस आहे.

पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, पुरुष गृह रक्षक पथक, महिला गृह रक्षक पथक, वन रक्षक दल, एनसीसी मुलांचे पथक, एनसीसी मुलींचे पथक, अग्निशामक पथक, स्काऊट बॉईज पथक, मुलींचे स्काऊट गाईड पथक, आरएसपी मुलांचे पथक, आरएसपी मुलींचे पथक, एअर स्कॉड्रन एनसीसी पथक, फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट पथक, पोलीस बँड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सीक लॅब व फिंगर प्रिंट ब्युरो व्हॅन पथक, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन, दहशदवाद विरोधी पथक, दंगल नियंत्रण पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ, शिक्षण विभागाचा चित्ररथ, अग्निशामन वाहन, १०८ रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी चित्ररथ, तंटामुक्त अभियान चित्ररथ जवानांच्या शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. 

यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून त्यांना गुलाब पुष्प देवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मान्यवर आणि विद्यार्थी, विद्यार्थींनीचीही भेट घेवून त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभाग प्रमुख, आजी- माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उप निरीक्षक मधुकर चौगुले, सहायक पोलीस उप निरीक्षक रवींद्र नुल्ले, नक्षलग्रस्त भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उप अधीक्षक गणेश बिरादार, उप निरीक्षक योगेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिपक भंडवलकर, उपनिरीक्षक राहूल वाघमारे, रविकांत गच्चे, प्रितमकुमार पुजारी, सोमनाथ कुडवे, रोहन पाटील, किशोर खाडे, विक्रांत चव्हाण, विवेकानंद राळेभात, अभिजीत भोसले, प्रमोद मगर, भागवत मुळीक, अजित पाटील यांना विशेष सेवा पदक प्रदान करुन गौरविण्यात आले.

खेळाडूंचा गौरव

क्रीडा क्षेत्रामध्ये विश्व विक्रम केल्याबद्दल डॉ. केदार साळुंखे, राष्ट्रीय युवा पुरस्कार ओंकार नवलीहाळकर, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१७ डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल वडगाव, शालेय व सामाजिक कार्यात साईराज पांडे, जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत माणगाव, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शिवाजी पाटील, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता विनय जाधव, गुणवंत खेळाडू सुनील कोनेवाडकर आणि आभा देशपांडे, गुणवंत खेळाडू दिव्यांग कमलाकर कराळे, थेट पुरस्कार सोनल सावंत आणि वैष्णवी सुतार, जिल्हा उद्योग केंद्राकडील लघु उद्योजक जिल्हा पुरस्कार प्रथक संजय डी. माळी, मे. फायर फ्लॉय फायर पंप्स, प्रा.लि., द्वितीय (विभागून) तानाजीराव बापूसाहेब पाटील मे. यशश्री पॉली एक्स्ट्रजन, तानाजी सावर्डेकर मे. यश रेफ्रिजरेशन, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थी मैथीली सुंदर शिंदे यांना ५० हजार आणि शेजल शंकर कांबळे यांना २५ हजार रुपयाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. खेलो इंडिया युथ गेम्स मधील ४२ खेळाडूंचा सामुहिक सत्कार यावेळी करण्यात आला.

देशभक्तीपर गीतांनी रोमांच उभे राहीले

सांस्कृतिक कार्यक्रमात महापालिकेच्या ल.कृ. जरग विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावरील समुह नृत्य केले. केंद्रीय प्राथमिक शाळा शिवाजी मंदिर वडणगे यांनी ग्रामीण लेझिम प्रकार सादर केला. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ- बेटी पढाओ पथनाट्य सादर केले. संजीवन इंग्लिश मेडियम स्कुल रंकाळा यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत उपस्थितीत सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी ‘माणुसकीच्या शत्रू संगे युध्द आमचे सुरु’ आणि अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारात सारे ही समुह गीते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

पूरग्रस्तांना मदतीचा हात

जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना एकूण ३२१ कोटी ४५ लाखाहून अधिक मदत वाटप केली आहे. अद्यापही उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान वाटप प्रक्रिया सुरु आहे. पूरबाधित लोकांना देय असणारी सर्व मदत विनासायास व तात्काळ देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे ७८ हजार २२८ हेक्टरवरील तीन लाखांवर शेतकरी बाधीत झाले तर अवकाळी पावसामुळे १५८४ हेक्टरवरील ७८६१ शेतकरी बाधीत झाले आहेत. त्यांना रोख स्वरुपातील १६० कोटींची मदत तसेच २९५ कोटींची मदत कर्जमाफीच्या माध्यमातून सहकार विभागाकडून प्रस्तावित केली आहे. 

पुलांची होणार तपासणी

महापुरामुळे जिल्ह्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन पुलांची सुरक्षितता तपासण्यासाठी 31 मोठ्या पुलांची आयआयटी मद्रास या संस्थेमार्फत करुन आयआयटीकडून सूचविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्राधान्य क्रमाने करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी सांगितले. पूर परिस्थितीला तोंड देण्याचे दृष्टीने रस्ते आणि पुलांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एशियन अर्थसहाय्यातून कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हायटेक कृषी साधन-संपदा निर्माण होणार

जिल्ह्यात यावर्षी ७ कोटीचा कृषी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यात शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादीत मालावर प्रक्रिया करण्यासाठी १३ कोटींची योजना राबविली जात आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून हायटेक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १६ कोटीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. यामध्ये संरक्षीत शेती, प्रक्रिया उद्योग इ.चा फायदा शेतकऱ्यांना होणार असून एक प्रकारे हायटेक कृषी साधन-संपदा निर्माण होणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी