शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ६५ टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

शासनाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करून जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी दि. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते ...

शासनाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करून जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी दि. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या शाळा आणि त्यामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली. जिल्ह्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण १०५४ शाळा आणि त्यामधील एकूण विद्यार्थी संख्या २,२४,४४३ इतकी आहेत. त्यापैकी ९७५ शाळांमध्ये प्रत्यक्षात वर्ग सुरू झाले आहेत. त्यातील उपस्थित विद्यार्थी संख्या १,४४,९१९ आहे. शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोरोनाबाबतची भीती असल्याने अद्याप ३५ टक्के विद्यार्थी वर्गामध्ये येत नाहीत. त्यात अधिकतर नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालकांच्या मागणीनुसार ग्रामीण भागातील अनेक शाळांनी इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग गेल्या महिन्यात सुरू केले आहेत. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला आहे.

चौकट

एकही विद्यार्थी संक्रमित नाही

जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. या वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. मात्र, एकही विद्यार्थी संक्रमित झाला नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून शाळांनी वर्ग भरविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या दक्षतेच्या सर्व उपाययोजना शाळांनी केल्या आहेत. त्याचा शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे. डिसेंबर अखेरच्या आकडेवारीनुसार एकूण ६५ टक्के विद्यार्थी वर्गात उपस्थित असल्याचे लोहार यांनी सांगितले.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळा : १०५४

वर्ग सुरू असणाऱ्या शाळा : ९७५

एकूण विद्यार्थी संख्या : २२४४४३

वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी : १४४९१९