शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गरिबांच्या घरकुलांसाठी मिळाली ४ हजार टन वाळू, महापूर नियंत्रणाअंतर्गत वाळू धोरणाची अंमलबजावणी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 16, 2025 18:57 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : गेल्यावर्षी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणाचा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ३२४ जणांना फायदा झाला. ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : गेल्यावर्षी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणाचा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ३२४ जणांना फायदा झाला. पाटबंधारे विभागाने महापूर नियंत्रणाअंतर्गत प्रस्तावित केलेल्या शिरोळमधील अर्जुनवाड, ढालवाड व शेडशाळ या तीन ठिकाणांहून ४ हजार ११३ टन वाळूचा उपसा करण्यात आला आहे. याची मुदत १० जून रोजी संपत आहे.

मात्र, यंदाच्या वाळू धोरणात महापूर नियंत्रण विषयाचा समावेश नाही, तसेच बारमाही वाहत्या नद्या असल्याने जिल्ह्यात वाळू उपसा होणार नाही, ही पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब ठरली आहे.नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा केल्याने माेठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास हाेत आहे. दुसरीकडे यानिमित्ताने वाळूची तस्करी, बेकायदेशीर वाहतूक आणि त्याअनुषंगाने गुन्ह्यांमध्ये वाढ, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले असे अनेक प्रकार घडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी वाळू धोरण जाहीर केले. वर्ष २०२३ मध्ये जाहीर केलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत १० जूनच उजाडला. त्यामुळे पहिल्या वर्षी मोजक्या जिल्ह्यांमध्ये शासकीय दरात वाळू उपसा झाला.जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड, ढालवाड व शेडशाळ या तीन ठिकाणांहून ४ हजार ११३ टन वाळूचा उपसा करून ताे प्रधानमंत्री आवास योजनेतील ३२४ जणांच्या घरकुलासाठी देण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत परवानगीकोल्हापुरात दरवर्षी सगळ्या नद्यांना पूर येतो. वाळू धोरणात मागील वर्षीपर्यंतच्या अधिसूचनेत महापूर नियंत्रणासाठी नदीपात्रातील गाळ, वाळू उपश्याला परवानगी देण्यात आली. त्यानुसार पाटबंधारे विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे जिल्ह्यातील शिरोळमधील वरील तीन गावांच्या ठिकाणी वाळू, गाळ उपश्याची परवानगी मागितली. जिल्ह्यात वरील तीन ठिकाणांवरील डेपोंमधून ७२०० टन वाळूला मागणी नोंदवली गेली. त्यापैकी ४ हजार ११३ टन वाळू ६०० रुपये प्रतिब्रास याप्रमाणे लाभार्थ्यांना विकण्यात आली.

काय आहे यंदाचे धोरण?नव्या वाळू धोरणात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत वाळू, गाळ उपश्याचा समावेश नाही. बारमाही वाहत्या नद्यांमधील वाळू उपसा करायचा नाही हा कायदा असल्याने जिल्ह्यात यंदा वाळू उपसा होणार नाही.

वाळू धोरणात महापूर नियंत्रणाच्या तरतुदीचा समावेश नाही. शासनाने कृत्रिम वाळू उपश्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवातीला २० टक्के आणि नंतर १०० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे निर्देश दिले आहेत. - आनंद पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना