शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत २०६ जणांचे मर्डर; रागाने बघितले, गँगवॉर, अनैतिक संबंधातून सर्वाधिक खून 

By उद्धव गोडसे | Updated: July 8, 2025 12:31 IST

हल्ल्यात २६४ जण मरता-मरता वाचले: एलसीबीकडून बहुतांश गुन्ह्यांचा उलगडा

उद्धव गोडसेकोल्हापूर : कुणी रागाने बघितले म्हणून थेट समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला. कुणी गँगवॉरमधून पाळत ठेवून विरोधी टोळीतील तरुणाचा काटा काढला. कुणी गावात पाणी सोडताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला संपवले, तर कुणी अनैतिक संबंधातून मित्राचाच खून केला. अगदी क्षुल्लक कारणातून जिल्ह्यात मुडदे पडत आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत २०६ खून झाले, तर २६४ जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला. किरकोळ कारणातून खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रागाने बघितल्याच्या कारणातून कुरुंदवाड येथील सिद्धार्थ चौकात अक्षय दीपक चव्हाण (वय २६, रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला. गांधीनगर येथे दारू पिताना झालेल्या वादातून आशुतोष सुनील आवळे (२६, रा. गांधीनगर) याचा मित्रानेच खून केला. या दोन्ही घटना रविवारी (दि. ६) रात्री उशिरा घडल्या. या घटनांनी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची तीव्रता पुन्हा स्पष्ट केली आहे. किरकोळ वादातून थेट मुडदे पाडण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. गेल्या महिन्यात उचगाव येथे लिव्हइनमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीचा तरुणाने खून केला.हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मदरशातून सुटी मिळावी यासाठी अल्पवयीन मुलाने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केला. आर्थिक वादातून मडिलगे (ता. आजरा) येथे पतीने पत्नीचा खून केला. हातकणंगले तालुक्यातील तमदलगे येथे सहा लाखांची सुपारी देऊन मोठ्या भावाने मद्यपी लहान भावाचा काटा काढला. कर्नाटकातील अथणी येथून आलेल्या टोळीने अनैतिक संबंधातून जोतिबा डोंगरावर एकाचा खून केला. अशा अनेक घटनांनी जिल्हा हादरला. पोलिसांनी तातडीने तपास करून सर्व खुनांचा उलगडा केला. आरोपींना अटकही झाली. मात्र, किरकोळ वादातून थेट खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच वाढती गुन्हेगारी सामाजिक स्वास्थ्याला बाधक ठरत आहे.खुनासोबत जीवघेणे हल्लेही गंभीरवर्ष - खून - खुनाचा प्रयत्न२०२२ - ५० - ५९२०२३ - ५२ - ८६२०२४ - ६८ - ६९७ जुलै २०२५ पर्यंत - ३६ - ५०

एलसीबीने लावला छडाजिल्ह्यातील बहुतांश गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीच्या पथकांनी केले आहे. खून करून सहा महिने लपलेले आरोपीही पोलिसांनी शोधून काढले. बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.गँगवॉर, नशेबाजीचा परिणामशहरासह गांधीनगर, इचलकरंजी येथे गुन्हेगारांच्या टोळ्यांची दहशत वाढली आहे. वर्चस्ववादातून टोळ्यांध्ये संघर्ष वाढल्याने खून आणि खुनाचा प्रयत्न, मारामारीच्या घटना वाढत आहेत. गांजा, कोकेन, ड्रग्ज अशा अमली पदार्थांची विक्री वाढल्याने गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे दिसत आहे.