शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी आघाडीत २० नेते अन‌् २१ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आपली आघाडी भक्कम करण्यासाठी एकमेकांना ओढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पॅनलमध्ये २१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आपली आघाडी भक्कम करण्यासाठी एकमेकांना ओढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पॅनलमध्ये २१ जागा आहेत आणि नेत्यांची संख्या मात्र २० झाली आहे. कोणाकडे किती मते आहेत, हे पाहूनच पॅनलची बांधणी करावी लागणार आहे. मात्र नेत्यांची गर्दी आणि रुसवे-फुगवे पाहता जागावाटपावरून विरोधी आघाडीची दमछाक होणार हे निश्चित आहे.

सत्तारूढ गटाला शह देण्यासाठी भक्कम आघाडी करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा फाम्यूर्ला ‘गोकुळ’मध्ये राबविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आमदार पी.एन. पाटीलवगळता सगळे आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊही लागले. त्यातील अनेकांची इच्छा नसतानाही एकत्र यावे लागल्याने त्यांच्या मतदारसंघात गोची झाली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह या आघाडीत २० नेते आहेत. जागा २१ आणि नेते २० असल्याने पॅनलचा समतोल साधताना सगळ्यांचीच दमछाक होणार आहे. नेत्यांची स्वत:सह वारसदारांना रिंगणात उतरण्याची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यात अनेकांनी दोन जागांची मागणी केल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे.

आबीटकरांपाठोपाठ नरकेंचाही दोन जागांचा आग्रह

आमदार विनय कोरे, प्रकाश आबीटकर यांच्यापाठोपाठ आता माजी आमदार चंद्रदीप नरके हे दोन जागांवर आग्रही आहेत. स्वत:चा गट टिकवण्यासाठी त्यांनी चुलत्यांशी संघर्षाची भूमिका घेतली. ‘करवीर’मधील त्याना मानणारे ठराव व विधानसभेचे राजकारण बळकट करण्यासाठी येथे एक जागा मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

नेते आलेत; पण मते येणार का?

महाविकास आघाडी म्हणून नेते एकत्र आले खरे मात्र त्याचे मतात रूपांतर होणार का? स्थानिक पातळीवरील राजकारण डोके वर काढणार असून, एकमेकांचे उट्टे काढण्याचे प्रकार झाले तर आघाडीसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.

‘बचाव’ कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

‘गोकुळ’ बचाव म्हणून गेली पाच वर्षे संघर्ष केल्यानंतर पॅनलमध्ये आपणाला संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांची आहे. मात्र प्रचारास लागलेले नेत्यांचे वारसदार व अंतर्गत हालचाली पाहता यातील बहुतांशी जणांना रिंगणाबाहेरच थांबावे लागणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.