शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

कसबा वाळवे येथे १०० रुग्ण, बँकासह सर्व व्यवहार १० दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST

तुरंबे : राधानगरी तालुक्यात ५५० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. १९ गावांत रुग्णांचे प्रमाण सध्या वाढत आहे. ...

तुरंबे : राधानगरी तालुक्यात ५५० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. १९ गावांत रुग्णांचे प्रमाण सध्या वाढत आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये येण्या-जाण्यास पूर्ण मज्जाव करण्याची आवश्यकता आहे.

तालुक्‍यातील ४० गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे या आजाराचा संसर्ग संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता कमिटी यांनी कडक अंमलबजावणी करण्याची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागाला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आहे.

तिटवे येथे दोन रुग्ण दगावल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील रुग्णवाढ असणाऱ्या गावांना प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. रुग्णसंख्या कमी होण्यासाठी कडक पाऊल उचलत १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. कसबा वाळवे गावात तब्बल १०० रुग्ण आहेत. त्यामुळे या गावातील सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या बँक, किराणा दुकान बंद आहेत. स्थानिक प्रशासनस्तरावर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता घेण्याची सूचना प्रांत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मोठी गावे चिडीचूप आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर अखंड तालुक्यात लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे.

पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ४० गावांमधील आढळलेले रुग्ण असे - कसबा वाळवे १००, राशिवडे ४१, धामोड २७, पालकरवाडी २४, राधानगरी २०, कसबा तारळे १८, गुडाळ, सोळांकूर, आवळी बुद्रूक तिटवे, सरवडे प्रत्येकी १४, तारळे खुर्द १३, ठिकपुर्ली १२, घोटवडे, तळगाव, पुंगाव, शिरगाव प्रत्येकी ११, कासारपुतळे तुरंबे प्रत्येकी १०, सोन्याची शिरोली, नऊ कोते, नरतवडे प्रत्येकी ८, आमजाई, व्हरवडे कोदवडे, माजगाव प्रत्येकी ७, चंद्रे, तरसंबळे, मजरे, कासारवाडा, मांगेवाडी, मुसळवाडी, शेळेवाडी प्रत्येकी ६, कुंभारवाडी, चक्रेश्वरवाडी, बनाचीवाडी, बारडवाडी, येळवडे, मोघर्डे प्रत्येकी ५, अर्जुनवाडा १, चांदेकरवाडी ३, कपिलेश्वर ३, मांगोली २, आकनूर १, खिंडीव्हरवडे २, सिरसे १, आणाजे.

कोट

बाजारपेठ असणाऱ्या मोठ्या गावात अधिक संपर्क येत असल्याने रुग्णवाढ

राधानगरी तालुक्यातील राशिवडे, धामोड, कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे, सोळांकूर आदी गावांमध्ये बाजार भरतो. बाजार बीट असणारे गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर छोट्या-मोठ्या गावातील लोकांचा नित्य संपर्कामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.- डॉ. राजेंद्रकुमार शेट्ये, राधानगरी तालुका आरोग्य अधिकारी