शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात टँकरमाफिया सक्रिय;  कोरोना काळात नागरीकांना विकत घ्यावे लागतेय पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 13:06 IST

कल्याण डोंबिवलीतील ग्रामीण भाग, दिवा व इतर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून  पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.

- मयुरी चव्हाण

कल्याण: कल्याण डोंबिवलीतील ग्रामीण भाग, दिवा व इतर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून  पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. याचा फायदा  पाणी माफिया घेत असून उन्हाळ्यात या माफियांची चांगलीच चांदी होताना दिसत आहे. उन्हाळ्यात पाण्याची  टंचाई अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने कोरोनाच्या संकटातही  जास्तीचे पाणी  नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे.उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर टँकरच्या दरात काहीशी वाढ झाली असून आगामी काळात  या दरात दुपटीने  व  तिपटीने वाढ  होईल यात काही शंका नाही. मात्र पाणी टंचाई असतानाही बांधकाम व्यावसायिक आणि टँकरमाफियांना मुबलक  पाणी कसे काय उपलब्ध होते?  असा प्रश्न निर्माण झाला आहे.         27 गाव व 14 गावात पाण्यामुळे अनेक मोर्चे निघाले. दिव्यात तर अनेक सोसायट्यांच्या बाहेर पाणी विकत मिळेल अशा आशयाचे पत्रकही लावण्यात आले आहेत.  दिव्यात 90 टक्के नागरिक हे पाण्यासाठी  टँकरवर अवलंबून आहे.एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून चोरून तसेच  नदी, खाडी येथील पाणी उपसून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी नागरिकांना विकले जात आहे. उन्हाळ्याला सुरवात झाली असून   टँकर माफियाही सज्ज  झाले आहेत. 

निवडणूक काळात  मतदार राजाला अनेक प्रलोभने दाखविली जातात. त्यातच ग्रामीण भागात पाण्याचा मुद्दा नेहमीच तापलेला असतो. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या काळात पाण्याचा मुद्दा थंड करुन मतदारांना खुश करण्यासाठी " मोफत टँकर " पुरविण्याचे पद्धशीरपणे प्रयोजन  देखील राजकीय पक्षांकडून केले जाते. 

सद्यस्थिती

दिवा - 

दिव्यामध्ये  500 लिटर पाण्यासाठी  250 तर  1000 लिटर पाण्यासाठी नागरिकांना 1600  रुपये मोजावे लागत आहे.  एप्रिल महिन्यात हेच दर  दुपटीने वाढतात. दिवसाला सुमारे  150 ते 200 टँकरने पाणीपुरवठा या भागाला होत आहे.  

27 गाव - 

एमआयडीसीकडून 27 गावांना दररोज 78 दशलक्ष इतका पाणीपुरवठा केला जातो. सध्या या परिसरात पाणी कपातीचे संकट असून  अनेकवेळा कमी दाबाने पाणी येत असल्याने येथील नागरिकांनाही  खाजगी  टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. 

14 गाव - 

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली शहरांना लागून असलेल्या  या  14 गावांमध्ये बोरिंगच्या  खाऱ्या पाण्यावर  नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहेत . वापरण्यासाठी  टँकरचे   पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या बाटल्यांमध्ये पाणी विकण्यासाठी गाड्या या भागत फिरकत असतात. 

दिव्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी येत. नागरिकांना पाणी मिळत नसले तरी टँकर ने पाणी विक्री करणाऱ्यांना मात्र नियमित पाणी मिळत. पाणी माफिया, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात असलेल्या अभद्र युतीमुळे दिवेकारांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.-  अँड.आदेश भगत ,अध्यक्ष, भाजपा दिवा.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका