शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 4:59 PM

kalyan : वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरिकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कल्याण : गेल्या आठवडय़ात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका उल्हासनदी लगत असलेल्या कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील नागरीकांना बसला. त्यांच्या घरात पाणी शिरुन त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मदतीचा हात देण्यात आला आहे.

वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरीकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चटई, अंथरुण, बेडशीट, टॉवेल, ब्लँकेट, अन्नधान्यांचे कीट देण्यात आले. जवळपास 2 ट्रकभरुन ही मदत वाटप करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे उपस्थित होते. 

अतिवृष्टीचा फटका जसा कोकणाला बसला आहे. त्याच प्रमाणो कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरीकांनाही बसला आहे. सखल भागातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यांना मदतीचा हात शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. संकट कोणतेही असो मदतीसाठी सदैव शिवसेना  पुढे असते हे खासदारांनी अधोरेखित करीत मदत केली आहे. 

पूरग्रस्त नागरीकांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तहसील कार्यालयाकडून सुरु करण्यात आले आहे. सरकारकडूनही पूरग्रस्ताना मदत दिली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे