शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्यूट! दुष्काळ अन् कर्जामुळे शेतकरी करत होते आत्महत्या, या अधिकाऱ्याने अशी केली त्यांची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 15:29 IST

शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे. 

(Image Credit : The Better India)

आज शेती करण्यात सर्वात मोठी अडचण दुष्काळ आणि कर्जामुळे येते. महाराष्ट्रातील एक गाव आहे धामणगाव. येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. स्थानिक नद्या कोरड्या पडल्या होत्या, पाऊस होत नव्हता. २०१६ ची घटना आहे. शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे. 

गावातील तरूण बनला जॉइंट कमिश्नर

जमिनीत पाण्यात कमतरता आणि दुष्काळ या समस्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य लोकही प्रभावित झाले. याचदरम्यान मुंबईतील इन्कम टॅक्स विभागाचे जॉइंट कमिश्नर डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी जेव्हा ही दुर्दशा पाहिली तर ते शॉक्ड  झाले. ते याच गावातील आहेत. अशात त्यांनी  आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. 

द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या समस्येबाबत काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आधी त्यांनी एक जल संरक्षण योजना लॉन्च केली. याने नद्या आणि भूजल स्थिती ठिक करण्याचं ठरवलं. नंतर छोटे बांध आणि जल संरक्षणासाठी खोदकाम केलं. या प्रयत्नातून २२ कोटी लीटर पाणी जमा होऊ शकतं. या परिसरातील पाण्याची समस्या दूर झाली.

इतरही गावात केला सुधार

हेच मॉडल त्यांनी इतर १६ गावांमध्ये लॉन्च केलं. ज्यामुळे अनेक गावे ३ वर्षांच्या आत दुष्काळातून बाहेर पडलीत. ते स्वत: एका शेतकरी कुटूंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. आई शिक्षिका आहेत. शेतीच्या समस्या त्यांनी पाहिल्या आहेत. त्यांनी UPSC जमिनीत बदल करण्यासाठीच जॉइन केली होती.

डॉ. चव्हाण म्हणाले की, '३० वर्षांआधी कोणत्याही पोकलेन मशीनी नव्हता. त्यामुळे लोकांनी नुकसानाच्या सीमेची परवा न करता विहिरी मॅन्युअल पद्धतीने खोदण्यात आल्या. विहिरींची खोली ७० फूट झाली. त्यामुळे पाण्याची समस्या वाढली. शेतकरी आधी केवळ पावसाळ्यात शेती करत होते. वर्षभर दुसरं उत्पन्न नव्हतं. त्यामुळे लोक शहराकडे जाऊ लागले. गावात केवळ वयोवृद्ध राहिलेत. आर्थिक चक्र सीमित झालं. आमच्याकडे काहीच सेव्हिंग नव्हतं. त्यामुळे काही समजायच्या आत आम्ही एका चक्रव्यूहात अडकलो होतो'.

या कामात गावातील लोकांनीही त्यांची खूप मदत केली. काही एनजीओ समोर आल्यात. गावातील लोकांनी १ हजार रूपयांपासून आर्थिक मदत केली. ज्यांना जी जमेल ती मदत केली आणि आज गावातील पाण्याची समस्या दूर झाली. इथला शेतकरी सुखावला आहे. आज याचा फायदा ३० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्र