राममंदिरासाठी २३ वर्षे पायात बूट-चप्पल न घालणारे वै.नारायण महाराज जुनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 06:56 PM2020-08-05T18:56:45+5:302020-08-05T18:57:07+5:30

अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत (२००८ ) म्हणजे २३ वर्षे पाळली.

Vai Narayan Maharaj Junare who did not wear shoes and slippers for 23 years for Ram Mandir | राममंदिरासाठी २३ वर्षे पायात बूट-चप्पल न घालणारे वै.नारायण महाराज जुनारे

राममंदिरासाठी २३ वर्षे पायात बूट-चप्पल न घालणारे वै.नारायण महाराज जुनारे

googlenewsNext

मुक्ताईनगर : अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत (२००८ ) म्हणजे २३ वर्षे पाळली.
मूळचे तांदुळवाडी सिध्देश्वर, ता.नांदुरा, जि.बुलढाणा येथील रहिवासी संत आदिशक्ती मुक्ताईचे निष्काम सेवाव्रती, विणेकरी वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे अयोध्या आंदोलनात १९८६ पासून सहभागी झाले होते. तेव्हापासून २३ वर्षे २००८ पर्यंत पायात बूट, चप्पल अशी कोणतीही पादत्राणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात कधीच मरेपर्यंत घातली नाही. तत्कालीन तालाखोलो आंदोलन व शिलापूजन, कारसेवा आदी प्रत्येक लढ्यात उपक्रमात हिरीरीने सहभागी झाले. घराघरात लढा पोहचवला. विश्र्व हिंदू परिषद मोताळा प्रखंड प्रमुख, खामगाव जिल्हा संत समिती प्रमुख, विहिंप विदर्भ प्रांत आजीवन सदस्य ई. जबाबदारी सांभाळली होती. विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतात राममंदिर लढ्यातील एक निस्पृह तळमळीचा कार्यकर्ता म्हणून स्वतंत्र ओळख होती. श्रीरामपंत जोशी, राजेश जोशी, बापूसाहेब करंदीकर हे महाराजांच्या निस्पृहकार्याचा गौरव अनेक वेळा करायचे. सहकारी भानुदास गोंड गुरुजी, विजू कुलकर्णी, नारायणदादा कोलते व अन्य कारसेवकासह अयोध्येत कारसेवेतसुध्दा अग्रेसर होते. कारसेवेनंतर पोलिसांनी चौकशा लावल्या. त्यावेळी महाराज रावेर येथील वारकरी गोंडू बुवा यांच्याकडे तीन महिने राहिले. आयुष्यभर आपल्या कीर्तन-प्रवचनात राममंदिर आंदोलन जनजागृती हा विषय असायचा. व्यासपीठ कुठले आहे कोणत्या पक्षाचे आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नव्हते. आपले रामजन्मभूमीविषयी विचार बेधडकपणे मांडायचे. नारायण महाराज यांची आई मुक्ताईवर विशेष निष्ठा होती. दरमहा वारीवर प्रल्हादराव पाटील यांची भेट व्हायची. भाऊ नेहमी म्हणत, बुवा किती दिवस अनवाणी फिरता घाला चप्पल त्या आजकाल चामड्याच्या नसतात पण? महाराज ठाम राहायचे.
आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प.पू.मोठेबाबा नेहमी कामानिमित्त विदर्भ किंवा खानदेशात आले तर आवर्जून विचारायचे नारायण बूवा? राममंदिरवाले आहेत का? बूट घातला की नाही अजून? त्यांना म्हणा की बुट? घाला मोठेबाबांचा निरोप आहे परंतु गुरूंचीसुद्धा माफी मागत शेवटपर्यंत प्रतिज्ञा मोडली नाही. आयुष्याचे शेवटी शेवटी प.पू.भास्करगिरी महाराज देवगड यांनी महाराजांचे पायांना जास्त त्रास होतांना पाहिले व लाकडी खडावा पाठवून दिल्या होत्या. आईसाहेब मुक्ताई फडावरील स्व.नारायण महाराज जुनारे रामजन्मभूमी आंदोलनातील एक पणती होते. बुधवारी अयोध्येत राममंदिर भूमिपूजन झाले. या आनंदाच्या क्षणी महाराज आपल्यात नाहीत पण स्वर्गात नक्की आनंदात असतील, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

Web Title: Vai Narayan Maharaj Junare who did not wear shoes and slippers for 23 years for Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.