शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अमृत अंतर्गत ३५ हजार घरांना दिले नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता जवळपास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. मनपा पाणी पुरवठा विभागाकडून नवीन नळकनेक्शन देण्याचा कामालादेखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत शहरात ३५ हजार घरांना नळकनेक्शन देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुशील साळुंखे यांनी दिली. येत्या तीन महिन्यात शहरातील अन्य भागातदेखील कनेक्शन देण्याचे काम पूर्ण होणार असल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले आहे.

अमृत योजनेनुसार शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळू शकणार आहे. तसेच ज्या भागात मनपा अंतर्गत पाणी पुरवठा होत नव्हता त्या भागातदेखील मनपाकडून आता पाणी पुरवठा केला जाणार आहे. ऑक्टोबरपर्यंत अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागात मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्षभराआधीच नळ कनेक्शन देण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली होती. जेणेकरून योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना लगेच नवीन योजनेनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

लॉसेस टाळण्यासाठी कमी कनेक्शवर भर

शहरातील अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन देण्याचा मुद्दा काही दिवसांपासून ऐरणीवर आहे. मात्र, नवीन अपार्टमेंटच्या ठिकाणी सम तयार असताना त्या ठिकाणी प्रत्येक रहिवाशाला स्वतंत्र कनेक्शन दिल्यास पाण्याचे मोठ्या प्रमाणात लॉसेस होऊ शकतात. त्यामुळे पाण्याची नासाडीदेखील होईल. तसेच जे अपार्टमेंट जुने आहेत तसेच त्या ठिकाणी नवीन टाकी किंवा सम करणे शक्य नसेल अशा ठिकाणच्या रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन देण्याचा विचार मनपाचा सुरू असला तरी ही संख्यादेखील कमी कशी होईल, यावरदेखील मनपाचा विचार सुरू आहे.

नवीन अपार्टमेंटमध्ये दोन कनेक्शन

गेल्या १० ते १५ वर्षात बांधण्यात आलेले अपार्टमेंट हे बहुमजली आहेत. त्यात ८ ते १० पेक्षा जास्त फ्लॅट बांधण्यात आले आहेत. तसेच अपार्टमेंटच्या जागेतच हजारो लीटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी तयार केलेली आहे. त्यामुळे २००८ च्या नियमानुसार भूमिगत टाकीत पाण्याचा साठा करण्याचा नियम लागू होत असून, अशा अपार्टमेंटमध्ये फ्लॅटच्या संख्येनुसार एक इंची व पाऊण इंची नळ कनेक्शन दिले जात आहे. भूमिगत टाकीतून फ्लॅटधारक गरजेनुसार पाण्याची उचल करू शकणार असल्याचे पाणी पुरवठा अभियंता सुशील साळुंखे यांनी सांगितले.

सर्वांना मिळणार नळकनेक्शन

शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. अनेक भागात नळकनेक्शन देण्याचे काम सुरू झाले आहे. आता नळ कनेक्शन देताना, ज्यांनी आधी कनेक्शन घेतले नव्हते अशांनादेखील मनपाकडून नळ कनेक्शन दिले जात आहे. जे अनधिकृत नळधारक आहेत त्यांना नळ कनेक्शन दिले तर मनपा प्रशासनाला पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्नदेखील मिळणार आहे. कारण शहरात तब्बल २० हजारहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. तसेच हुडकोसारख्या भागातदेखील नळ कनेक्शन देऊन, पाणी पट्टी आता वसूल करण्यात येणार असल्याचे धोरण मनपाकडून निश्चित केले जात आहे.