शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निकाल तर लागला, पण गुणपत्रक महाविद्यालयांना पोहोचली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निकाल जलद गतीने लावली गेली, पण महाविद्यालयापर्यंत निकालांच्या प्रती अद्यापपर्यंत पोहोचलेल्या ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निकाल जलद गतीने लावली गेली, पण महाविद्यालयापर्यंत निकालांच्या प्रती अद्यापपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परिणामी, तृतीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे तत्काळ निकालांच्या प्रती महाविद्यालयांना पाठविण्यात याव्या, अशी मागणी एनएसयूआयच्या वतीने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक किशोर पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. नुकतेच पदवीच्या तृतीय वर्षाचे निकालही जाहीर झाले आहे. मात्र, निकालपत्र अद्याप महाविद्यालयापर्यंत पोहोचलेले नाही. त्यातच निकालपत्र मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेटही मिळू शकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्यापीठाने महाविद्यालयांना निकाल पत्रक पाठवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत निकालपत्रक मिळतील व संबंधित महाविद्यालयातून लवकरात लवकर ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतील, अशी ग्वाही परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांकडून देण्यात आली. निवेदन देताना प्रदेश सचिव एनएसयूआयचे चेतन बाविस्कर, घनश्याम पाटील, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.