शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ठराव झाला, धोरण निश्चित, मात्र गाळे कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेची सर्व आर्थिक परिस्थिती ही केवळ गाळे प्रश्नावर अवलंबून असून, गाळे प्रश्न मार्गी लागला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेची सर्व आर्थिक परिस्थिती ही केवळ गाळे प्रश्नावर अवलंबून असून, गाळे प्रश्न मार्गी लागला तरच मनपाची आर्थिक परिस्थिती सावरेल, असे मत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अंदाजपत्रक सादर करताना व्यक्त केले होते. या प्रश्नावर आता मनपाने धोरण निश्चित करून, तसा ठरावदेखील सत्ताधाऱ्यांनी महासभेत बहूमताने मंजूर केला आहे; मात्र धोरण निश्चित करून, ठराव करून दीड महिन्यांपेक्षा अधिकचा वेळ होऊनही मनपा प्रशासन गाळे प्रश्नावर अजूनही कारवाई किंवा लिलाव करण्यास अपयशी ठरलेले दिसून येत आहे.

गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मालकी असलेल्या राजकमल चौक परिसरातील १८ मुदत संपलेले गाळे जिल्हा परिषदेने सील करून, ताब्यात घेतले आहेत. तीन वर्षांपूर्वीचा प्रश्न जिल्हा परिषदेने सोडविला असून, तब्बल ९ वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला गाळे प्रश्न मात्र मनपा प्रशासनाला सोडविता आलेला नाही. याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. याच विषयावर मनपाची सर्व आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. याच विषयामुळे मनपाला शहरातील नागरिकांना सुविधा देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. असे असतानाही आता मनपाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाडे वसुलीसह गाळे ताब्यात घेण्याची कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

ठरावाला केवळ ३५ जणांनी दिला पाठिंबा

१२ मे रोजी झालेल्या महासभेत गाळे प्रश्नाबाबत मनपाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळाली होती; मात्र ऑनलाइन सभेत हा विषय घेण्यात येवू नये, अशी भूमिका भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी घेतली होती, तसेच सेनेकडून ४२ जणांचा पाठिंबा असल्याचे सांगत हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता; मात्र या प्रस्तावाला केवळ ३५ जणांनी पाठिंबा दिला असून, सेना व बंडखोर नगरसेवकांमधील अनेक नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे दिसून येत नाही. दरम्यान, ऑनलाइन सभेत त्यावेळी ५३ जण उपस्थित असल्याचे दिसून येत होते. तर काही जण कनेक्ट होऊ शकले नव्हते. या ठरावामुळेदेखील मनपाने कारवाई थांबवली आहे का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

भाजपकडूनही प्रस्ताव नाही

महासभेत हा ठराव बहुमताने मंजूर केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी ऑनलाइन महासभेत पूर्ण बहुमत नसल्याचे सांगत हा विषय प्रलंबित ठेवण्याची मागणी केली होती. हा ठराव मंजूर झाला तर न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप सदस्यांनी दिला होता; मात्र दीड महिन्यात भाजपनेदेखील याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेली नाही. त्यामुळे भाजपनेदेखील या ठरावाला अप्रत्यक्ष पाठिंबाच दिल्याचे दिसून येत आहे.

जि.प.करू शकते, मग मनपा का नाही?

गाळे प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या प्रकारे कारवाई केली आहे, त्या प्रकारे मनपा प्रशासन का कारवाई करत नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष जि.प.मालकीच्या गाळ्यांबाबतच्या प्रश्नावर जि.प.चे कोणतेही आर्थिक गणित फारसे अवलंबून नव्हते. तरी जि.प.ने याप्रकरणी कारवाई केली; मात्र मनपा प्रशासनाला आता कारवाई करण्यास नेमका काय अडथळा आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.