शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधतांना रेल्वे पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी रेल्वेचा धक्का लागल्याचे दोन वर्षात २२५ अपघात झाले ...

जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी रेल्वेचा धक्का लागल्याचे दोन वर्षात २२५ अपघात झाले असून त्यात या लोकांचा जीव गेलेला आहे, त्यातील ७२ जणांची तर ओळखच पटली नाही. त्यामुळे या अनोळखी मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेतांना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

रेल्वेचा अपघात म्हटला की, पोलिसांची कसरत आलीच. रेल्वे रुळावरील मृतदेह आणण्यासाठी सर्वात आधी वाहनाची अडचण येते, थेट घटनास्थळापर्यंत वाहनच जाऊ शकत नाही. गेलेच तर किमान २०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत वाहन पोहचते. रेल्वे अपघातातील मृतदेहांची अवस्था पाहता रेल्वे पोलिसांना मांसाचे तुकडे गोळा करावे लागतात, हे काम करीत असताना पोलीस नाकीनऊ येतात, मात्र कर्तव्य महत्त्वाचे असल्याने त्याला प्राधान्य द्यावेच लागते. बऱ्याच घटनांमध्ये पोलिसांना मृतदेह ने-आण करण्यासाठी वाहनच मिळत नाही. रात्रीच्यावेळी तर मोठी समस्या निर्माण होते. वाहन न मिळाल्याने काही वेळा तर बैलगाडी, हातगाडी यावर मृतदेह आणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

मृतदेहाची ओळख पटविण्यात अनेक अडचणींना सामना करावा लागतो. खिशात आधारकार्ड किंवा काही पुरावा असला तर ओळख पटवायला सोपं जात असली तरी नातेवाइकांशी संपर्क व्हायला खूप अडचणी येतात. रेल्वे अपघातातील मृत शक्यतो दुसरा जिल्हा किंवा राज्यातीलच असतात, त्यामुळे नातेवाइकांना यायला सहज दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही मृतदेहांचा चेंदामेंदा झालेला असल्याने त्यांची ओळख पटतच नाही. अंगावरील कपडे, शरीरावरील निशाणी व इतर काही खूण असेल तर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करावे लागतात, तरी देखील ओळख पटतेच असे नाही. दोन वर्षात तब्बल ७२ मृतांची ओळखच पटली नाही, त्यामुळे रेल्वे पोलिसांनाच या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले.

७२ मृतदेहांची ओळखच पटली नाही

- लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत २०१९ या वर्षात ५९ तर २०२० या वर्षात १३ असे एकूण ७२ मृतदेहांची शेवटपर्यंत ओळखच पटली नाही. त्यामुळे या मृतदेहांवर शासकीय नियमानुसार तीन दिवस सांभाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.

- काही मृतदेह तर असे होते की जागेवरच चेहऱ्याचा चेंदामेंदा तर काहींचे शरीर व मुंडके वेगळे अशी होती. बहुतांश मृतदेहांचे मांसाचे तुकडे होते, तरीही घटनास्थळावरच पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. नियमानुसार जी प्रक्रिया आहे, ती पार पाडावीच लागते.

कोट..

अनोळखी मृतदेह सांभाळण्यासह जेथे घटना घडते, तेथे जायला ना सरकारी वाहन ना रुग्णवाहिका मिळते. रात्री-अपरात्री कर्मचाऱ्यांना दुचाकीवरच जाऊन पंचनामा करावा लागतो. अशा वेळी कोणतेच वाहन मिळत नाही. विनवण्या करून व खिशातून पैसे खर्च करून मिळेल त्या वाहनाने मृतदेह रुग्णालयात न्यावा लागतो.

-सुरेश सरडे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस स्टेशन

२०१९

रेल्वे अपघात :१६५

मृत्यू : ५९

२०२०

रेल्वे अपघात :६०

मृत्यू : १३

--