शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या जेवणावळीत ५० हजारांच्या दंडाचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र नागरिकांकडून पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र नागरिकांकडून पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या चुका केल्या जात आहेत. लग्न समारंभामध्ये पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. शहरातील मेहरुण व रामेश्वर कॉलनीमधील लग्न समारंभामध्ये झालेल्या गर्दीमुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी वधू-वर पित्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी निर्बंध कायम ठेवले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभामध्ये ५० पेक्षा अधिक नागरिकांना सहभागी होण्यास बंदी घातली आहे. मात्र सोमवारी शहरातील रामेश्वर कॉलनी व मेहरुण परिसरात दोन लग्न समारंभांचे आयोजन केले होते. या दोन्ही लग्न समारंभांमध्ये १०० हून अधिक नागरिक सहभागी झाल्याचे मनपा पथकाने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे मनपा उपायुक्तांनी याबाबत वधू-वर पित्याला मंगळवारी नोटीस बजावली आहे.

प्रत्येकी ५० हजार रुपयांचा ठोठावला दंड, बजावली कारणे दाखवा नोटीस

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने रामेश्वर कॉलनी भागातील युवराज चिंधु रायसिंगे यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, याबाबतची नोटीस त्यांना पाठविण्यात आली आहे. यासह मेहरुण परिसरातील हनुमाननगर भागातील भास्कर रतन माळी यांनादेखील ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून, नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, मनपा प्रशासनाकडून लग्न समारंभाबाबत आतापर्यंत करण्यात आलेली ही अकरावी कारवाई आहे. दरम्यान, सोमवारीच याबाबत मनपाच्या पथकाने लग्न समारंभामध्ये जाऊन व्हिडिओ चित्रण देखील करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

सहा दुकाने सील

मनपा प्रशासनाकडून मंगळवारीदेखील शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात लपून छपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील सुरू असलेल्या सहा दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून दुकाने सील करण्यात आली आहेत. मनपा प्रशासनाकडून आतापर्यंत शहरातील ५०० हून अधिक दुकाने सील करण्यात आली आहेत.

हरी विठ्ठल भागातील बाजार हटवला

मंगळवारी शहरातील हरी विठ्ठलनगर भागातील भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजार मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उठवून लावला. सकाळीच महापालिकेचे पथक या भागात दाखल झाले होते. तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटण्याच्या आधीच मनपाच्या पथकाने विक्रेत्यांना या ठिकाणावरून हटवले.