शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आता विकास दाखवावाच लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:35 IST

केंद्र, राज्य एकाच पक्षाचे असूनही विकास कामे करवून घेण्यात अपयश आल्यानेच भाजपची झाली दमछाक, ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने गोंधळलेला, गांगरलेला विरोधी पक्ष ताकदीने मैदानात उतरलाच नाही

मिलिंद कुलकर्णीअवघ्या चार महिन्यांपूर्वी खान्देशातील लोकसभेच्या चारही जागा मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भाजपला घवघवीत यश तर सोडून द्या, २०१४ ची कामगिरीदेखील करता आली नाही. ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने विरोधी पक्ष गोंधळलेला होता, तो जर मजबुतीने लढला असता तर भाजपची अवस्था आणखी बिकट झाली असती. मैदानात विरोधकच दिसत नाही, ही भाजप नेतृत्वाची शेखी किती फोल होती, हे निकालातून दिसून आले. विकास कामे न झाल्याने भाजप आणि शिवसेनेला हा फटका बसला आहे. आता कामे केली तरच धडगत आहे, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने दिला आहे.खान्देशातील निवडणुकीने काही बाबी ठळकपणे समोर आणल्या आहेत, त्याचा गांभीर्याने सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांनी विचार केला तर पुढीच वाटचाल सुकर होणार आहे. अन्यथा यंदाच्या निवडणुकीपेक्षा बिकट स्थिती होण्याची वेळ फार दूर राहणार नाही.भाजपकडे दोन मंत्रिपदे होती. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण ही महत्त्वपूर्ण खाती गिरीश महाजन यांच्याकडे तर पर्यटन, रोजगार हमी योजना, अन्न व औषधी प्रशासन ही खाती जयकुमार रावल यांच्याकडे होती. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद होते. रावलांकडे नंदुरबार तर महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. सेनेच्या दादा भुसे यांच्याकडे धुळ्याचे पालकमंत्रीपद होते.केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणला, विविध योजना खेचून आणल्या असा दावा या मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी केला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्टÑीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष यांनी प्रचार सभा घेऊन ७० वर्षे झाला नाही, एवढा विकास आम्ही पाच वर्षांत केला, असा दावा केला. परंतु, जनतेला तो पटलेला दिसत नाही. अन्यथा २० पैकी ८ जागांवर समाधान मानावे लागले नसते. शिवसेनेने जळगावात चांगली कामगिरी केली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही, हे दुर्लक्षून चालणार नाही.विरोधी पक्षाचा विचार केला, तर भाजप-सेनेच्या वादळापुढे हे पक्ष सक्षमपणे निवडणुकांना सामोरा गेलेच नाहीत, असे वातावरण होते. राष्टÑवादी काँग्रेसने मुक्ताईनगरची खेळी वगळता अन्यत्र काही प्रयोगदेखील करुन पाहायचे नाकारले. काही जागांवर उमेदवारदेखील मिळाले नाही, बळजबरीने उमेदवारी देण्यात आली. अमळनेरचे अनिल भाईदास पाटील या तीन वर्षांपूर्वी भाजपमधून आलेल्या नेत्याने पक्षाला यश मिळवून दिले, हे लक्षात घ्यायला हवे.काँग्रेसची अवस्था त्या मानाने बरी आहे. आवाका ओळखून पक्षाने निर्णय घेतले आणि समाधानकारक कामगिरी केली. अर्थात ती पक्षाची किती आणि नेत्यांची वैयक्तिक किती हा प्रश्न संशोधनाचा ठरावा. अमरीशभाई पटेल आणि चंद्रकांत रघुवंशी, माणिकराव गावीत, शिवाजीराव दहिते हे दिग्गज नेते ऐन निवडणुकीत पक्ष सोडून गेले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा गड खिळखिळा झाला. शिरीष नाईक, के.सी.पाडवी आणि कुणाल पाटील हे तिन्ही उमेदवार हे पक्षापेक्षाही व्यक्तीगत आणि कौटुंबिक कर्तृत्वाने निवडून आले. रावेरमधून शिरीष चौधरी हेदेखील त्याला अपवाद नाही.निवडणुका संपल्या. आता पक्षभेद विसरुन खान्देशातील विकासविषयक मुद्यांवर काम झाले तरच पुढील निवडणुकीमध्ये जनता उभे करेल. अन्यथा भल्याभल्यांना आडवे केलेले आपण पाहिलेच आहे.पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा, ३७० कलम हटविणे या दोन मुद्यांभोवती निवडणूक केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न पुरता फसला. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, दळणवळणाची गंभीर झालेली समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोºया हे मुद्दे विरोधकांनी लावून न धरता देखील जनतेला या प्रश्नांवरील डोळेझाक पसंत पडली नाही. रस्त्यातील खड्डा बुजवता येत नाही, धड सुविधा देत नाही आणि किती दिवस कोट्यवधींच्या निधीच्या गमजा माराल, हे वास्तव त्यांच्यासमोर होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव