शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण महिन्याने दिला शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

कजगाव, ता. भडगाव : दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा मोठा चिंतेत सापडला होता. मात्र, पावसाने गेल्या ...

कजगाव, ता. भडगाव : दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा मोठा चिंतेत सापडला होता. मात्र, पावसाने गेल्या दीड ते दोन महिने दांडी मारल्यानंतर लागोपाठ चार ते पाच दिवस कधी हलका कधी रिमझिम बरसल्याने शेतकरी राजा समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके मोठ्या संकटात सापडली होती. शेतातील विहिरींची पाणीपातळीही खूप कमी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, श्रावण महिन्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि तब्बल वर्षभराच्या कालखंडानंतर, तसेच पावसाळा अर्धा संपल्यानंतर तितूर नदीला थोडे पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तितूरला जेमतेम आलेल्या पाण्यामुळे शेतातील विहिरींच्या जलपातळ्यांत थोडी वाढ झाली आहे.

पाऊस जरी पडला असला, तरी विहिरींची पाणीपातळी अजूनही वाढलेली नाही. त्यामुळे बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जोरदार पाऊस पडला, तर तितूर नदीही मोठ्या प्रवाहाने वाहेल. पाणीपातळी वाढून शेतकऱ्यांना आगामी काळात फायदा होईल. पावसाच्या आगमनाने शेती कामांना वेग आला आहे व मजुरांचीही कामाची चिंता दूर झाली आहे. पावसाच्या आगमनाने मजुरांना कामे मिळाली असल्याने मजुरांनीही समाधान व्यक्त केले आहे

चाराटंचाईची शक्यता

दरम्यान, पावसाने तब्बल दोन महिने दांडी मारल्याने, शेतकऱ्यांचे नियोजन मोठ्या प्रमाणावर कोलमडले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात पावसाने दांडी मारल्याने पशुपालकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाच्या दांडीने भविष्यातील चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उत्पन्नावर होणार परिणाम

तब्बल दीड महिन्याच्या वरुणराजाच्या दांडीमुळे बरड भागातील, तसेच कोरडवाहू जमिनीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. बऱ्याच क्षेत्रात पिकाने ऊन पकडल्यामुळे पिके सुकू लागली होती. अनेक पिकांनी मान टाकल्या होत्या. लागोपाठ पाच दिवस पडलेल्या पावसाने काही पिकांनी तग धरला आहे, तर काही पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. यात ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल, अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे.

फोटो कॅप्शन

240821\img-20210823-wa0040.jpg~240821\24jal_4_24082021_12.jpg

थोडया प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे वाहणारी कजगाव ची तितुर नदी~अर्ध्या पावसाळ्यानंतर काही प्रमाणात वाहणारी तितूर नदी.