शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बस येईना! पायीच धरावी लागते शाळेची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही ग्रामीण भागात अजूनही राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पायी वाट धरावी लागत आहे.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांची ८ डिसेंबर २०२० तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजली़ सुमारे ५ लाख ६७ हजार विद्यार्थी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये प्रवेशित आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावली असून उर्वरित विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. दरम्यान, अजूनही काही ग्रामीण भागांमध्ये बससेवा बंद आहे़ तर काही ठिकाणी वेळेवर बस येत नसल्यामुळे तासनतास बसची वाट विद्यार्थ्यांना पहावी लागते़ त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

तालुक्यातील वावडदाजवळील बिलवाडी गावातील विद्यार्थ्यांना बससेवा मिळत नसल्यामुळे चक्क पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. बिलवाडी येथील चाळीस विद्यार्थी हे म्हसावद शाळेत शिक्षण घेत आहेत. आधी एसटी बस ही १० वाजता नियमित सुरू होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती बंद आहे. खासगी वाहनांचे भाडे परवडणारे नसल्यामुळे शेवटी पायीच विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. दरम्यान, जळगाव, वावडदा, बिलवाडी व म्हसावद बससेवा सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बिलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. बससेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देण्यात आला आहे.

विद्यापीठ बससेवाही सुरू करण्याची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही महाविद्यालय व विद्यापीठ बंद आहे. मात्र, शैक्षणिक कामानिमित्त विद्यार्थ्यांना विद्यापीठात ये-जा करावी लागते. परंतु, एसटी महामंडळाची विद्यापीठ बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अखेर खासगी वाहनांतून ये-जा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

एकूण शाळा

पाचवी ते आठवी - २०५८

नववी ते बारावी - ८६६

एकूण विद्यार्थी

पाचवी ते आठवी - ३ लाख ३४ हजार ८५२

नववी ते बारावी - २ लाख ३२ हजार ५८९