शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला येणार ज्ञानप्रकाश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:59 IST

लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनशक्ती केंद्राचे आयोजन१९ ते २१ असे चार दिवस कार्यक्रमराज्यातील ३५ साधक करणार मार्गदर्शनसकाळ आणि सायंकाळ दोन सत्रात प्रबोधन१५ नागरिक व विद्यार्थ्यांपर्यत पोहचवणार ज्ञानप्रकाशपत्रपरिषदेत दिली माहिती

चाळीसगाव, जि.जळगाव : लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आठ महिला आणि २७ पुरुष साधक उपस्थित राहणार आहे. तालुक्यातील १५ हजार नागरिक, विद्यार्थ्यांपर्यंत यात्रेचा ज्ञानप्रकाश पोहचविण्याचा संकल्प येथील साधकांनी शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला.चाळीसगाव परिसरातील ३५ साधकांनी गेली दोन महिने तालुकाभरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि नागरिकांशी जनजागृतीपर संवाद साधला. यासाठी २२० बैठका घेऊन ज्ञानप्रकाश यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेचे हे २६ वे वर्ष असून चाळीसगाव येथे दुसऱ्यांदा यात्रेचे आयोजन होत आहे.भडगाव रोडस्थित लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात १९ पासून यात्रेला सुरुवात होईल. दरदिवशी सकाळी साडे नऊ ते साडे दहा आणि सायंकाळी साडे सहा ते रात्री आठ पर्यंत कौटुंबिक सौख्य, ध्यान एक अनुभव, वास्तूशुद्धी कशी कराल?, अभ्यास यशाच्या युक्त्या (स्ट्रॉबोस्कोप टेस्टसहा), ताणमुक्त जीवन, युवाक्रांती, सुजाण पालकत्व आदी विषयांवर राज्यभरातून आलेले अनुभवी साधक प्रबोधन करतील. काही विवेचनांमध्ये प्रात्यक्षिक व चाचणी देखील घेण्यात येणार आहे. प्रवेश विनामुल्य आहे.पत्रपरिषदेला शंतनू पटवे, प्रकाश वाबळे, डॉ. नीलेश देशपांडे, हेमंत कुलकर्णी, राजेश येवले, विनायक देशपांडे उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव