शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला कांग, वाघूर, सूर नदी कोरडीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

जामनेर : यंदा तालुक्यात दमदार पावसाअभावी वाघूर, कांग व सूर नद्यांना एकही पूर न आल्याने भविष्यात पाणी ...

जामनेर : यंदा तालुक्यात दमदार पावसाअभावी वाघूर, कांग व सूर नद्यांना एकही पूर न आल्याने भविष्यात पाणी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मंगळवारअखेर सरासरीच्या ५० टक्के इतका पाऊस झाला असून, पिकांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र धरण, तलाव भरले नाही.

कांग, वाघूर व सूर या नद्या तालुक्यातील जलवाहिन्या असून, यंदा पावसाळ्यात मुसळधार पाऊस न झाल्याने एकाही नदीला पूर आला नाही. तीनही नद्यांचे पाणी वाघूरला मिळत असल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होते.

वाघूर धरणातून जळगाव, जामनेरला पिण्यासाठी व शेतीसाठीदेखील पाणी पुरविले जाते.

पूर न आल्याने धरणाच्या जलसाठ्यात वाढ झालेली नाही. पुढील नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास नदी-नाले वाहून निघतील अशी अपेक्षा आहे.

----------------------------------------------------------------------

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा

वाघूर धरण गेल्या वर्षी जुलैमध्येच १०० टक्के भरले होते. धरणातील पाण्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी वापर केला जातो. सध्या धरणात ६२ टक्के पाणी साठा असून फक्त पिण्यासाठी राखीव ठेवल्यास दोन वर्ष पुरेल असे वाघूर धरण अभियंत्यांनी सांगितले.

----------------------------------------------------------------------

तालुक्यातील नेरी, हिंगणे, पळासखेडे बुद्रुक, केकतनिंभोरे, हिवरखेडे बुद्रुक, चिंचखेडे बुद्रुक, खादगाव, गारखेडे या भागातील शेती वाघूर धरणाच्या पाणी साठ्यावर अवलंबून आहे. गोद्रीजवळील कांग प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा आहे. प्ररकल्पातून फत्तेपूर व परिसरातील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पुरविले जाते.

पावसाळ्याचे तीन महिने संपण्याच्या मार्गावर असून सप्टेंबरमध्ये पाऊस न झाल्यास भीषण संकट ओढावू शकते.

फोटो कॅप्शन

पावसाअभावी कोरडे पडलेले जामनेरच्या कांग नदीचे पात्र.