शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

भुुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 16:37 IST

लॉकडाऊनच्या काळात प्राध्यापकांना आपापल्या घरात बौध्दिक मेजवानी मिळावी या उद्देशाने कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे रविवारी एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध देशातील दोनशेवर प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांचा सहभागप्रा. डॉ. गिरीश कोळी यांचा यशस्वी प्रयोग

भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक कार्य सुरूच रहावे आणि प्राध्यापकांना आपापल्या घरात बौध्दिक मेजवानी मिळावी या उद्देशाने येथील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे रविवारी एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यात विविध देशातील विविध भागातील दोनशेवर प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, आज जगाच्या परिस्थितीचा विचार करताना असे लक्षात येते की भविष्यात संगणक आणि त्यावरील अंतर्गत नेटवर्क खूप महत्त्वाचे आहे. हे नेटवर्क मानवी जीवनातील बऱ्याच उपक्रमांसाठी अतिशय योग्य असल्याचे सिद्ध होणार आहे. आज ना उद्या आम्हाला या उपकरणाच्या उपयोगितांशी जोडणे बंधनकारक असेल. भविष्यातील आवश्यकतांच्या दृष्टिकोनातून या वेबिनारचे आयोजन केले आहे. आमच्या महाविद्यालयाच्या हिंदी विभागाने आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील आॅनलाईन चर्चेचा हा पहिला प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदी प्रा.डॉ. मधु खराटे यांनी केले. वेबिनारसंबंधी त्यांनी विचार मांडले. ते म्हणाले, हिंदी साहित्यात विविध विमर्श समोर आले असून, त्यामध्ये स्त्री विमर्श, दलित विमर्श, आदिवासी विमर्श व किन्नर विमर्श आहे. विमर्श म्हणजे समाजातील जो वर्ग अतिमागास आहे त्यावर समाजाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी लेखक साहित्याच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. साहित्य संवदेना प्रकट करण्याचे उत्तम साधन आहे. साहित्यकारांचा प्रमुख उद्देश समाजातील उपेक्षित घटकांना नवीन प्रवाहात आणण्याचा आहे.टोकियो यूनिवर्सिटी आॅफ फॉरेन स्टडीज, टोकियो, जापान येथील डॉ. श्याम सुंदर पांडे यांनी आपल्या बीज भाषणामध्ये जागतिक स्तरावरील हिंदी साहित्य आणि विमर्श यांची संकल्पना मांडली. यामध्ये त्यांनी साहित्यातील नारी विमर्श, दलित विमर्श, आदिवासी विमर्श, किन्नर विमर्श, अल्पसंख्यान विमर्श, वृध्द आणि विकलांकग विमर्श विषयाची माहिती दिली. विमर्श साहित्य सर्जना निमार्ण करण्यास प्रेरणा ठरते. विविध विमर्शांच्या माध्यमातून समस्या निवड करून उपयायोजना करण्यास कारणीभूत ठरते.बुलंद शहर, उत्तर प्रदेश येथील डॉ. विजेंद्र प्रताप सिंह यांनी भारतीय साहित्यामध्ये किन्नर विमर्शचे विविध संदर्भ देताना सांंिगतले की, समाजात असा एक घटक आहे की जो आजही समाजातील मुख्य प्रवाहामध्ये येवू शकला नाही. समाजामध्ये वावरताना आपणास विविध घटना दिसतात व साहित्यकार त्या घटनांचा आधार घेवून यर्थाथ व कल्पनेचा आधार घेवून सहित्य निर्मिती करतात. किन्नर समुदायासाठी आज कायदे तयार करण्यात आले असून, त्यांचे पालन करताना खूप कमी ठिकाणी पहायला मिळते. किन्नर म्हणून आपलेच आई व वडिल त्याला वाळीत टाकतात. त्यांनी विविध पुस्तकांचे उदाहरण देवून किन्नर समुदायची व्यथा मांडली.मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील डॉ.दत्तात्रय मुरूमकर यांनी दलित विमर्श या विषयांवर म्हणाले, समाजातील दलित हा असा एक घटक आहे की त्याला प्रवाहात आण्ण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.राजपपिपला, गुजरात येथील डॉ. हितेश गांधी यांनी आदिवासी विमर्श या विषयावर चर्चा करताना त्यांनी आदिवासी समाजाचे जीवन दर्शन घडविले. समाजामध्ये आजही आदिवासी समाज पूर्णपणे प्रवाहात येवू शकलेला नाही. शासनाच्या विविध योजना आदिवासी वगार्साठी मंजूर केल्या जातात पण शेवटर्यंत योजना येत नाही. हे सर्व साहित्याच्या माध्यमातून समाजापुढे मांडले जाते आणि शेवटी प्रसारमाध्यम व सरकारला जाग येवून कार्यवाही केली जाते. अशा कित्येक आदिवासी जमातींना आपल्या मूळ स्थानापासून हाकलून लावले जाते व जंगले नष्ट केले जाते. खरा आदिवासी जंगलाचे संरक्षण करतो पण शेवटी आदिवासींची अवहेला समाजामध्ये आजही मोठया प्रमाणावर दिसून येते.महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. जिजाबराव पाटील यांनी समारोपात विचार मांडले की, हिंदी क्षेत्रातील अांतरराष्ट्रीय स्तरावरील ही पहिलेच वेबिनार असून पूर्णपणे नियोजनबध्द पध्दतीने पार पाडण्यात आले. देशातील विविध क्षेत्रातील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.सूत्रसंचालन व आभार धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरचे प्राध्यापक व सह-समन्वयक डॉ.विजय सोनजे यांनी केले. कार्यक्राची धूरा कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश एस. कोळी यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्षा पद्मा कोटेचा, पदाधिकारी, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्या डॉ.शिल्पा पाटील, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही. धनवीज, सह-समन्वयक प्रा.नीलेश गुरूचल, डॉ.संजयकुमार शर्मा, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयBhusawalभुसावळ