शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-पीक पाहणी’ ठरतेय ग्रामीण शेतकऱ्यांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महिंदळे, ता. भडगाव : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांची फरपट होत आहे. पीक पाहणी झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

महिंदळे, ता. भडगाव : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांची फरपट होत आहे. पीक पाहणी झाली नाही तर आपल्याला शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही या विवंचनेत शेतकरी आहेत.

मोबाइल घेऊन आपल्या शेताच्या बांधावर शेतकरी दिसत आहेत; पण नेट प्रॉब्लेम, तर कधी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड होत नाही आणि

शासनाने परिपत्रक काढले...१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान शेतात जा. मोबाइल काढा. त्यावर ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा. त्यात माहिती भरा. सुरुवातीला आलेला ४ अंकी ओटीपी कायमचा लक्षात ठेवा. कोणतं पीक आहे हे त्यात लिहा. पिकासोबतचा तुमचा फोटो अपलोड करा. तलाठी हे काम करणार नाही.

सगळं तुमचं तुम्हीच करा. नांगरा, कोळपा, पेरा, धान्य काढा आणि मातीमोल किमतीत बाजारात विकून या प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्ड पाहिजे, सातबारा पाहिजे, फायदा झाल्यास सरकार डंका वाजविणार आमच्या धोरणाचं यश. तोटा झाल्यास निसर्गावर ढकलणार किंवा शेतकरी व्यसनी असतात म्हणणार, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकरी पीक पेरा लावण्यासाठी मोबाइलवर ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करू लागले आहेत आणि ओटीपी लक्षात ठेऊन माहिती भरायला सुरुवातही करीत आहेत. नाव, गाव, गट नंबर, सर्व्हे नंबर सगळे टाकून झाले. सोयाबीन, कपाशी, केळी, भेंडी, मका, बाजरी, ज्वारी, आदींसोबत उभा राहून फोटो काढला; पण डाउनलोड होईना, कारण रेंज येत नाही. आता ही तक्रार कोणाकडे करायची? उन्हातान्हात उभे राहून रेंज येण्याची वाट पाहत बसावे लागत आहे. तरीही जमिनीची नोंद टाकली व त्यात आपण पेरणी केलेल्या पिकांची नोंद केली तर पलीकडून मेसेज येतो. तुमच्या नावाने तेवढी जमीनच नाही. ही समस्या आपल्या टेक्नॉलॉजीची मग आता हा टेक्निकल प्रॉब्लेम कोण दूर करणार? असा सवालही केला जात आहे.

प्रतिक्रिया

शासनाने आता जो शेतकऱ्यांचा पीक पेरा तलाठ्याकडून काढून घेऊन ऑनलाइन केला; पण ग्रामीण भागात या ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही पीकपेरा लागत नाही. आम्ही काय करावे, असा प्रश्न पडला आहे. ही ऑनलाइन पद्धत शासनाने बंद करून तलाठ्याकडील पीक पेरा कायम ठेवावा.

गोपीचंद धनराज देवरे, शेतकरी, महिंदळे, ता. भडगाव

आम्हाला शासनाच्या विरोधात जायचे नाही. शासनाची ई-पीक पाहणी योग्यच आहे; पण ग्रामीण भागात अजूनही ऑनलाइन पद्धत वापरण्यास शेतकरी सक्षम झालेला नाही व आजही अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत. त्यामुळे पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी रेंज राहत नाही, तर काहींना ऑनलाइन करता येत नाही. यावर कायम उपाय काढणे आवश्यक आहे.

-उत्तमराव शामराव पाटील,

अध्यक्ष, वि. का. सो., महिंदळे