शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणमासात हनुमान मंदिराची कवाडे ठेवली जातात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST

रावेर : श्रावण मासातील धार्मिक सण व व्रतवैकल्यांची पर्वणी पाहता शिवभक्ती, दुर्गाभक्ती, गुरुदत्त तथा श्री हनुमान भक्ती सर्वत्र फुलत ...

रावेर : श्रावण मासातील धार्मिक सण व व्रतवैकल्यांची पर्वणी पाहता शिवभक्ती, दुर्गाभक्ती, गुरुदत्त तथा श्री हनुमान भक्ती सर्वत्र फुलत आहे. अशात तालुक्यातील खानापूर येथील श्रीराम मंदिरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराची कवाडे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याची अतिप्राचीन परंपरा जोपासली जात आहे.

भक्तिआराधनेच्या या श्रावण मासात संकटमोचन श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद ठेवण्याची अतिप्राचीन परंपरा जोपासणारे हे राज्यातील वा संबंध देशभरात एकमेव हनुमान मंदिर असण्याचा कयास श्री हनुमान भक्तांमधून व्यक्त होत आहे. श्री हनुमान भक्तांमध्ये यासंबंधी एक कुतूहल व्यक्त होत आहे.

खानापूर येथील पुरातन श्रीराम मंदिराची मोठी आख्यायिका सांगितली जाते. एका मूर्तिकाराने बैलगाडीवर विक्रीसाठी आणलेल्या श्री प्रभुरामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणाच्या अत्यंत मनमोहक मूर्तींची किंमत गावकऱ्यांच्या देणगीपेक्षा जास्त सांगितली. मूर्तिकाराने सांगितलेले मूल्य व लोकवर्गणी यात जमीन अस्मानाचा फरक राहिल्याने व्यवहार फिसकटला. म्हणून मूर्तिकाराने गावातून काढता पाय घेतला. तो मूर्तिकार पुढच्या कर्जोद गावी मुक्कामासाठी थांबला. तथापि या मुक्कामात त्याला प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला की, “मला खानापूरलाच थांबायचे आहे. त्या अनुषंगाने मूर्तिकाराने दुसऱ्या दिवशी पहाटे तडक खानापूर गाठले व खानापूरवासीयांनी दिलेली लोकवर्गणी स्वीकारून साक्षात दृष्टान्त घडवलेल्या श्री प्रभुरामचंद्रांच्या पावन मूर्तींचे पूजन करून त्या ग्रामस्थांच्या स्वाधीन केल्या. याच भव्य दिव्य अशा पश्चिममुखी असलेल्या श्रीराम मंदिराच्या पाठीशी सलग्न असे दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर साकारण्यात आले आहे. या पुरातन श्री हनुमान मंदिराच्या अंगणात असलेल्या भल्यामोठ्या दगडावर आषाढ वद्य अमावस्येनिमित्त बळी चढवून संपूर्ण श्रावणमासात ग्रामस्थ मांसाहार वर्ज्य करीत असत. किंबहुना, संपूर्ण श्रावणमासात श्री हनुमंतासमोर अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यासाठी श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद करून महिनाभरानंतर श्रावण वद्य अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्या वा पोळ्याच्या सणानिमित्त ग्रामवासीयांसाठी खुली करण्यात येत असल्याची आख्यायिका आहे. त्या अनुषंगाने प्राचीन परंपरा जोपासण्यात येत असल्याची माहिती ग्रामपुरोहित नरेंद्र धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ला दिली. संबंध राज्यात वा देशभरात ऐन धार्मिक व्रतवैकल्यांच्या श्रावणमासात श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद ठेवण्याची पुरातन परंपरा जोपासणारे खानापूर हे गाव कदाचित पहिले व एकमाद्वितीय असावे, असा कयास व्यक्त केला जात आहे.