शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट (डमी ९८३) लोकमत न्यूज ...

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट

(डमी ९८३)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातची पिकेदेखील वाया गेली होती. मात्र, नुकसानभरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला होता. त्यामुळे यावर्षी खरीप पीकविमा योजनेंतर्गत काढण्यात येणाऱ्या विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता, तर यावर्षी १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. या योजनेत लाभ मिळणे कठीण झाले असून, केवळ पीकविमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

कोट..

जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. अद्याप बँकेंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. ती संख्या आल्यास संख्या पुन्हा वाढलेली दिसून येईल.

-संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक

४० हजार शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

१. जिल्ह्यात भारतीय एक्सा इन्शुरन्स कंपनीला खरीप पीक विम्याचा तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या १ लाख ६३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला होता. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता.

२. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे काही अंशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण संख्येत ४० हजार शेतकऱ्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला होता.

जिल्ह्यातील एकूण शेतकरी १२ लाख

गेल्यावर्षी - १ लाख ६६ हजार ४९९

यावर्षी - १ लाख १९ हजार ३८८

एकूण खरीप क्षेत्र - ७ लाख २२ हजार हेक्टर

तालुकानिहाय विमाधारक

अमळनेर - ३१ हजार ७८९

चोपडा - १४ हजार ००३

जामनेर - १९ हजार ९९४

जळगाव - ३ हजार १९८

पारोळा - १८ हजार २३४

धरणगाव - ९ हजार ४६९

कोट

खरीप पीकविमा योजनेंतर्गत आम्ही जवळजवळ सर्वच पिकांचा विमा काढला होता. झालेले नुकसानदेखील मोठे होते. मात्र, गेल्यावर्षी आम्हाला नुकसानभरपाई मिळालीच नाही. यामुळे यंदा खरीप हंगामाचा विमा काढलेला नाही. काढूनदेखील पैसे वाया गेलेच असते. त्यापेक्षा विमा काढलेलाच न बरा.

-पंकज संभाजी पाटील, शेतकरी

गेल्यावर्षी विमा काढूनदेखील आम्हाला नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. पिकांचे नुकसान झाले. त्यात लावलेल्या खर्चाइतके उत्पन्नदेखील आम्हाला झाले नाही. यावर्षी विमा काढायचा का नाही? हा प्रश्न आमच्यासमोर होता. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता विमा न काढलेलाच बरा. असा शेतकऱ्यांचा कमी, विमा कंपन्यांचाच यामध्ये फायदा होत असतो.

-संजय सुभाष पाटील, शेतकरी