शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंच्या मागणीत ४० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:30 IST

जनजागृती : व्यापाऱ्यांनी माल न मागविल्याने स्वदेशी वस्तूंना वाढली मागणी

जळगाव : ‘स्वस्तात मस्त’ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत पसंती दिल्या जाणाºया चिनी वस्तूंना सध्या वाढत जाणारा विरोध व व्यापारी संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे यंदाच्या दिवाळीमध्ये जळगावात चिनी वस्तूंच्या मागणीत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. यामध्ये चिनी बनावटीच्या विद्युत रोशणाई (लाईटिंग), पणत्या, फटाके, आकाशकंदील इत्यादी वस्तूंची मागणी घटून भारतीय वस्तूंना पसंती दिल्या गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.भारतीय सणवार असो अथवा दैनंदिन वापरात येणाºया वस्तूंची बाजारपेठ गेल्या काही वर्षांपासून चिनी बनावटीच्या वस्तूंनी काबीज केली असल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून या चिनी वस्तूंना विरोध वाढू लागला. मात्र तरीही भारतीय वस्तूंच्या तुलनेत या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने त्यांची मागणी कायम असल्याचे बाजाजारपेठेत चित्र होते.यात होळी सणाला वापरात येणाºया पिचकाºया असो की रंग यात जास्त प्रमाण चिनी वस्तूंचेच असते. सोबतच वर्षभर लहान मुलांचे खेळणे आणि दिवाळीमध्येही विद्युत रोशणाई, आकाशकंदील, पणत्या, फटाके यामध्येही चिनी वस्तूंचीच अधिक विक्री होत असे. यामुळे भारतीय बनावटीच्या पणत्या व त्या-त्या भागातील कुंभार बांधवांच्या व्यवसायवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसून आला. सोबतच भारतीय लाईटिंग, आकाशकंदील यांचीही मागणी घटत असे.मात्र गेल्या वर्षी दिवाळीमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन व्यापारी बांधवांनी केले होते. मात्र तोपर्यंत भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या वस्तू दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी चिनी वस्तूंची केवळ २० टक्क्यांनी विक्री घटली होती.चिनी वस्तूंची आयात न करण्याचा घेतला निर्णयगेल्या वर्षांचा अनुभव पाहता या वर्षी जुलै महिन्यातच कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) संघटनेने चिनी वस्तूंची आयात न करण्याचा निर्णय घेत तसे आवाहनही व्यापाºयांना केले होते. त्यानुसार मोठ्या व्यापाºयांनीच चिनी वस्तू न मागविल्याने लहान शहरातील किरकोळ व्यापाºयांकडेही तो माल उलपब्ध होऊ शकला नाही. मुंबई येथून हा माल जळगावात येतो. मात्र मुंबईतील व्यापाºयांनीच तो न मागविल्याने जळगावातही व्यापाºयांनी आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय वस्तू उपलब्ध करून दिल्या.‘वापरा आणि फेका’पेक्षा टिकाऊला पसंतीचिनी बनावटीच्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांची कोणतीही शाश्वती (वारंटी, गॅरंटी) दिली जात नाही. त्यामुळे त्या एकदा वापरा व फेका अशाच त्या वस्तू असल्याचे नागरिकांनाही समजू लागल्याने वारंवार खर्च करण्यापेक्षा एकदाच खर्च करून टिकाऊ वस्तूंना पसंती दिली जात असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.चिनी बनावटीचे फटाके दोन वर्षापासूनच बंदफटाक्यांमध्येही चिनी बनावटीच्या फटाक्यांचे मोठे प्रमाण असे. मात्र दोन वर्षांपासून चिनी फटाके विक्री न करण्याचा निर्णय जळगाव डिस्ट्रीक्ट फायर वर्क्स असोसिएशनने घेतल्याने जळगावात या फटाक्यांची विक्री होत नसल्याचे सांगण्यात आले.चिनी वस्तू मुक्त होणार बाजारपेठयंदा चिनी वस्तूंची विक्री ४० टक्क्यांनी घटल्याचे प्रमाण असले तरी ते पुढील वर्षापर्यंत हे प्रमाण १०० टक्के होऊन बाजारपेठ चिनी वस्तू मुक्त होऊ शकेल, असा विश्वास कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कैट) राज्य संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी व्यक्त केला. यंदा गेल्या वर्षीचा माल शिल्लक असल्याचे मागणी घटल्याचे हे प्रमाण सध्या केवळ ४० टक्के दिसत असले तरी आता चिनी मालच आणला जाणार नसल्याने हे प्रमाण वाढणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव