शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

काँग्रेस ते भाजप व्हाया समाजवादी पार्टी : डॉ.राधेश्याम चौधरी यांनी अवघ्या आठ दिवसांत बदलले दोन पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:25 PM

बदलती राजकीय निष्ठा बनली राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

जळगाव : गेल्या पाच वर्षांपासून भाजपावर कडाडून टीका करणारे व आयुष्यात कधीही भाजपात जाणार नाही, असा दावा करणारे काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत विधानसभेच्या उमेदवारीसाठी समाजवादी पार्टीत तर माघारीनंतर गुरूवारी भाजपात प्रवेश केला. त्यांची बदलती राजकीय निष्ठा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून येऊ शकला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जळगाव शहर मतदार संघातून वैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉ.चौधरी यांना उमेदवारी दिली ह ोती. यातत्यांना केवळ ४ हजार १४ मते मिळाली होती. त्यानिवडणुकीपासूनच त्यांनी २०१९ च्या विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. पाच वर्ष त्यांनी अस्तित्वहीन होत आलेल्या शहर काँग्रेसच्यावतीने शहरातील समस्यांबाबत लहान-मोठे आंदोलने केली. महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी त्यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दररोज टष्ट्वीटरवर टष्ट्वीट करून काम मार्गी लावण्याबाबत आठवण करून देत होते. आतापर्यंत त्यांनी ९२० टष्ट्वीट केले होते.भाजपवर असायचा टीकेचा रोखडॉ.चौधरी हे आंदोलन, पत्रपरिषद, प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडताना मनपातील तसेच राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपावर त्यांचा टीकेचा रोख असायचा.उमेदवारी न मिळाल्याने नाराजकाँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेससोबत आघाडी केली. त्यात मागील निवडणुकीत जेथे राष्टÑवादी पहिल्या क्रमांकावर होती, ते मतदारसंघ राष्टÑवादीला सोडण्यात आले. २०१४ मध्ये राष्टÑवादीचे उमेदवार मनोज दयाराम चौधरी यांना ४८३५ मते तर डॉ.चौधरी यांना ४०१४ मते होती. त्यामुळे जळगाव शहर मतदार संघ पूर्वीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसकडे असूनही यंदा राष्टÑवादीला सोडण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने ते नाराज झाले. ५ आॅक्टोबरला त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘माझा काय दोष आहे? असे टष्ट्वीट केले होते.तर ७ आॅक्टोबर रोजी केलेल्या टष्ट्वीटमध्ये ‘पक्षाची प्रतिष्ठा वाढविणाऱ्या तरूण नेतृत्वाची जणू राज्याच्या नेतृत्वाने राजकीय हत्याच करायचा चंग बांधलेला दिसतो’ अशी नाराजी व्यक्त केली होती.डॉ. राधेश्याम चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेशउमेदवारी मिळत नसल्याने नाराज असलेले डॉ.चौधरी २ आॅक्टोबर पर्यंत काँग्रेसमध्येच होते. काँग्रेस भवनातील गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर डॉ.चौधरी यांनी ५ आॅक्टोबरला समाजवादी पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ७ आॅक्टोबर ही उमेदवारी माघारीची शेवटची मुदत होती. त्याच दिवशी े पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ.चौधरी यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत फोन केला. त्यासोबतच नुसता अर्ज मागे घेऊ नका, भाजपात या, कोणते पद पाहिजे ते बोलून घ्या, अशी आॅफरच दिली. अन् डॉ.चौधरी यांनी गुरूवार, १० आॅक्टोबर रोजी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतच भाजपात प्रवेश केला.बदलती राजकीय निष्ठा चर्चेत...काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असलेले डॉ.चौधरी पुरोगामी विचारसरणीचे. मात्र उमेदवारी मिळत नाही, म्हटल्यावर त्यांनी समाजवादी पार्टीकडे धाव घेतली. तर उमेदवारी दाखल केल्यानंतर दोन दिवसांत त्यांना भाजप प्रवेशाची आॅफर येताच त्यांनी उमेदवारी मागे घेतली व गुरूवारी भाजपात प्रवेश केला. आठवडा भराच्या कालावधीतच हे सर्व घडले. त्यामुळे राजकीय निष्ठा इतक्या झटपट बदलू शकतात? याबाबत सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातही चर्चा होत आहे.काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गुरुवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे डॉ. चौधरी यांचे स्वागत असल्याचे सांगत त्यांच्या प्रवेशाने भाजपला बळ मिळेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनीही डॉ. चौधरी यांच्यासोबत हस्तांदोलन करीत त्यांचे स्वागत केले.-गिरीश महाजन, पालकमंत्रीपक्षाशी लोक जुळवून संघटना वाढविणे हे आपले कामच आहे. अध्यक्ष म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. आज भाजपच विकास करू शकतो, असा विश्वास असल्याने भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे. चांगली मंडळी आल्याने पक्षाला त्यांचा लाभच होणार असून डॉ. राधेश्याम चौधरी हे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे.-आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजपडॉ़ राधेश्याम चौधरी यांचा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे़ त्यांनी पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या बाजूने उभे राहायला हवे होते़ मात्र, पक्ष सोडत त्यांनी पक्षाशी प्रतारणाच केली आहे़ प्रत्येक पक्षात मतभेद असतात़ शेवटी पक्ष मोठा असतो़ कोणताही पक्ष संपत नाही, काँग्रेसकडेही सक्षम कार्यकर्ते असून ते पक्षाला मोठ करतीलच.-अ‍ॅड़ संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष काँग्रेसकाँग्रेस पक्षाशी डॉ़ चौधरी एकनिष्ठ राहिले व त्यांनी पक्षासाठी अनेक कामे केली आहेत़ परंतु, पक्षाकडूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले़ त्यांना हवा तसा प्रतिसाद पक्षाकडून मिळाला नाही़ त्यांना भाजपात जाण्याची संधी मिळाली असेल तर ती का सोडावी़-साजीद हुसन्नोदीन शेख, चेअरमन, कोअर कमिटी, समाजवादी पाटीडॉ़ राधेश्याम चौधरी यांना पुढचे राजकीय भविष्य दिसत नसल्यामुळे त्यांनी संधीसाधूपणा साधत भाजपात प्रवेश केला आहे़ चौधरी यांना काँग्रेसकडून अंतर्गत विरोध होता तर समाजवादी पार्टीकडून नामांकन अर्ज भरल्यानंतरही विरोध झाला होता़ फक्त उमेदवारीसाठी त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला़-अशपाक पिंजारी, माजी महानगराध्यक्ष, समाजवादी पार्टीर् .

टॅग्स :Jalgaonजळगाव