शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चोपडा-अंकलेश्वर रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 8:43 PM

सा.बां. विभागाकडून दुर्लक्ष : मुरूम टाकण्याचेही सौजन्य नाही

चोपडा : चोपडा-अंकलेश्वर रस्त्याची चाळणी होऊन तीनतेरा झाले आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाकडून डोळेझाक होत असून त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.शहरातील प्रताप विद्या मंदिरापासून ते अंकलेश्र्वर ब-हाणपूर मार्गाला जोडणा-या जुन्या शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तेथून पुढे अंकलेश्वर महामार्गाची हद्द सुरू होते. मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांंमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माती वा बारीक मुरूम भरण्याचे कष्टही घेतले जात नाहीत.एखादा मोठा अपघात झाल्यावरच गांभीर्याने दखल घेतली जाईल काय? अशा प्रतिक्रिया वाहन धारकांकडून व्यक्त होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींंचा निधी देण्यात आला होता. पण काम निकृष्ट झाले असल्याने संपूर्ण रस्ता अत्यल्प काळात खराब झाला आहे. शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयापासून पालिका हद्दीतील रस्त्यासाठी दीड कोटीचा निधी मिळाला आहे. मात्र काम पावसामुळे सुरू करता येत नसल्याचे समजले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील खड्डे मुरूमाने भरावेत, अशी मागणी वाहनचालक तसेच नागसरिकांतून होत आहे.

पावसाच्या उघडिपीनंतर काम सुरू करणारचोपडा अंकलेश्वर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता खूप खराब आहे. त्याबाबत विचारले असता, त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन वेळा मुरूम भरला आहे. पुन्हा पाऊस बंद झाला की मुरूम टाकून खड्डे भरले जातील. सततच्या पावसामुळे भरलेला मुरूम टिकत नासल्याने पुन्हा खड्डे तयार होत आहेत. चांगली उघडीप मिळाली की पुन्हा काम सुरू केले जाईल. राहिलेल्या काही भागात नवीन डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती चोपडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी पी.जे. शुशिर यांनी दिली.