शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

बाल साहित्य हे आयुष्य घडविण्याचे ‘साधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:44 PM

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले ...

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले एकाकी होत आहेत. पुढे चालून या बालकांचा यंत्र होऊ द्यायचा नसेल तर त्यांच्या हातात चांगली पुस्तके वाचायला द्या. ही बाल साहित्यांची पुस्तके क्रिया नसून, तर आयुष्य घडविण्याचे खरे साधन आहे. असे मत नामवंत लेखक डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांनी रविवारी मांडले.सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावतर्फे रविवारी भास्कर मार्केट जवळील अखिल भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात एक दिवसीय सुर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सावंत हे बोलत होते.तत्पूर्वी सकाळी संमेलनाचे उद्घाटन जळगावातील बाल साहित्यिक गिरीश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर कवयित्री माया धुप्पड , संघपती दलुभाऊ जैन, उज्ज्वला टाटीया, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन उपस्थित होते. दरम्यान,यावेळी संमेलनस्थळाला कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह, व्यासपीठाला साने गुरुजी व्यासपीठ तर प्रवेशद्वाराला बालकवी नगर,धो. वे. जोगी प्रवेशद्वार असे देण्यात आले होते.यापुढे डॉ. सुरेश सावंत यांनी सांगितले की, कोवळ््या मुलांना संस्कारित करण्यासाठी आतापासूनच संस्कार रुजविणे गरजेचे आहे. ‘शब्द’ लिहायला किंवा वाचायला शिकविणारे शिक्षक आपल्याला खूप सापडतील. पण शब्द जगायला शिकविणारे शिक्षक सापडणे, दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत बाल साहित्यातील ‘शब्दच’ मदतीला धावून येत असल्याचे सांगितले. यावेळी बाल साहित्यिक योगेश पाटील यांनी, सामाजिक विकृतींना आळा घालण्यासाठी साहित्यनिर्मिती करणे, ही आपली जबाबदारी असून, लेखणी नावाचे शस्त्र आपल्याकडे आहे. कारण लेखनीने मने जिंकता येतात, युद्धे नाहीत आणि युद्धाने जग जिंकता येते, माणसे नाहीत. असे सांगत बदलत्या काळानुसार साहित्य प्रवाह कायम टिकून रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात कथाकथन झाले. यामध्ये सुभाषचंद्र वैष्णव (ह.मु. गोवा) व एकनाथ आव्हाड (मुंबई)यांनी सहभाग घेतला. तिसºया सत्रात शब्द झंकार या कविसंमेलनात डॉ. अशोक कोळी यांच्यासह विविध कविंनी कविता सादर केल्या.मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरणसंमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सूर्योदय बालमित्र पुरस्कार सुभाषचंद्र वैष्णव व एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. तर सुर्योदय बालनाट्य पुरस्कार मुंबई येथील ज्योती कपिले यांच्या ‘कोडी झाली नाटुकली’ या बालनाट्य लेखास देण्यात आला. तसेच सुर्योदय बालकाव्य पुरस्कार औरंगाबाद येथील गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बालकाव्य संग्रहास देण्यात आला. सूत्रसंचालन वैदेही नाखरे तर आभार सतिश जैन यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव