शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भाजपाने महिलांच्या सन्मानविषयी बोलूच नये; गुलाबराव पाटलांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 17:45 IST

मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता.

जळगाव:  केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेल्या  हरसिम्रत कौर यांना पंतप्रधान कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांनी एका शिपायाकडे आपला राजीनामा दिला. त्यांचा सन्मान झाला नाही. भाजपाच्या महिला आघाडीने त्यांच्यासाठी आंदोलन केले पाहिजे होते.  स्वत:ला महिलांचा सन्मान करता येत नाही, हे काय महिलांच्या सन्मानाविषयी बोलतील, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केली आहे. 

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर सोमवारी भाजपकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाला धरून गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली. सोमवारी दुपारी जळगावात असताना अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरे प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा यावेळी गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. बुलेट ट्रेन हा विषयच चुकीचा आहे.

 मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. पण बुलेट ट्रेन अहमदाबाद का झाली, असा आमचा विषय होता. आता मुंबईतील कारशेडच्या बाबतीत ते काही म्हणत असतील तर तो त्यांचा विषय आहे. आरेच्या बाबतीत म्हणायचे झाले तर लोकांसाठी काही गोष्टी जोपासल्या गेल्या पाहिजेत. पैशांच्या किंमतीपेक्षा तेथील नैसर्गिक जे वातावरण आहे, ते टिकवणे महत्त्वाचे आहे. आरेतील जागा सोडली तर आज मुंबईतील लोकांसाठी अशी कोणतीही जागा उपलब्ध नाही. आरे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेचे हित पाहिले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या विषयांना आमचा विरोध

सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विषयावरही त्यांनी मत मांडले. ते म्हणाले, नवीन कृषी कायद्यात काही मुद्दे चांगले आहेत तर काही मुद्दे चुकीचे आहेत. या विषयावर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. जे मुद्दे चांगले आहेत, त्यांचे स्वागत आहे. पण ज्यामुळे शेतकरी रस्त्यावर येतील, शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशा विषयांना आमचा कायम विरोध असेल, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाShiv Senaशिवसेना