शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

अन् चुकला काळजाचा ठोका; चाळीसगावला पुन्हा आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या ...

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या पुराने अनेकांचे संसार गिळले. घरे वाहून गेली. हजारो एकर शेतीचे नुकसान झाले असून, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली. जीवित, वित्तहानी झाल्याने ग्रामीण भागात अजूनही सन्नाटा आहे. शहरातही शिवाजी घाटावरील दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. रिंगरोड भागासह दाळेवाले खळे परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

पुराच्या याच कटु आठवणी आठ दिवसांच्या अंतराने बुधवारी सकाळी पुन्हा ताज्या झाल्याने चाळीसगावकर चांगलेच धास्तावले. पहाटेपासूनच डोंगरी व तितूर दुथडी भरून वाहत होत्या. घाट रोडवरील पुलासह भाजी मंडईच्या जवळील पुरावरूनही चार ते पाच फूट पाणी वाहत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता बामोशी बाबांच्या दर्गाहातील पायऱ्यांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले. बुधवारी दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुपारी १ वाजता वाहतूक सुरू होऊन संपर्कही पूर्ववत झाला.

चौकट

आमदारांसह प्रांताधिकारी व तहसीलदारांचे ‘जागते रहो’

मंगळवारी असलेली पावसाची संततधार, घोडेगाव व करजगाव परिसरात झालेली अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणार हे निश्चित होते. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले. नदीकाठावरील नागरिक, दुकानदारांना सर्तकतेच्या सूचना दिल्या गेल्या. नवीन पुलावरील फेरीवाल्यांना मंगळवारी दुपारीच येथून हटविण्यात आले. रात्री १२ नंतर नद्यांमधील पाणी पातळीत मोठी वाढल्याने मध्यरात्री आमदार मंगेश चव्हाण हे घाटरोडवर पोहोचले. बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांच्यासह प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून होते. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी पालिकेचा सायरनही वाजविण्यात आला.

-खडकी बु. येथे नदी काठालगत राहणाऱ्या १००हून अधिक नागरिकांना बुधवारी पहाटे धनंजय मांडोळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षितस्थळी हलविले.

चाैकट

हिरापूर रोड परिसरात नदीकाठच्या अनेक घरांमध्ये शिरले पाणी

बुधवारी पहाटे तितूर नदीला पूर आल्याने हिरापूर रोडलगत नदी काठावर असणाऱ्या अनेक घरांमध्ये १० ते १२ फुटांपर्यंत पुराचे पाणी घुसले. यात काहींचे संसार वाहून गेले. त्यामुळे हे नागरिक हवालदिल झाले आहेत.

- मंगळवार अखेर तालुक्यात ८९० मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या अनेक वर्षात प्रथम विक्रमी पर्जन्यमान झाल्याने ओल्या दुष्काळी स्थिती उद्भवली आहे.