शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

खरीपनंतर आता रब्बीचा हंगामही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून, बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून, बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. आता अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामातील नुकसानभरपाई देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसताना आता रब्बीचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरिपातील नुकसानभरपाई रब्बीत भरून काढण्याची आशा देखील अवकाळी पावसाने फोल ठरविल्या आहेत.

यंदा हवामान बदल परिणामाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप तर आता अवकाळीमुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत जात आहेत. रब्बीची लागवड झाल्यानंतर डिसेंबर महिन्यातच अवकाळीने हजेरी लावली; मात्र तेव्हा फारसा फटका रब्बीच्या पिकांना बसला नव्हता; मात्र पिकांची चांगली वाढ झाली असून, त्यात दाणे तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच पाऊस झाल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याचा खार धुतला गेला, गव्हाची वाढही थांबणार

बुधवारी झालेल्या पावसामुळे हरभऱ्याचा खार धुतला गेला आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दाणे लागण्याच्या प्रक्रियेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असून, दाणे लहान व बारीकच राहण्याची शक्यता आहे. तर थंडीच गायब असल्याने गव्हाचीही वाढ खुंटली आहे. दादर व मक्याला देखील पावसाचा फटका बसला असून, जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी पट्ट्यात रात्री पावसासोबतच हवेचा जोर देखील जास्त असल्याने दादर आडवी पडली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे मक्यावर अळीचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता आहे.

काय आहे पावसाचे कारण

जम्मू-काश्मीर व त्याला लागून असलेल्या हिमाचल प्रदेश भागात पश्चिमी विक्षोभ तयार झाला आहे. हा विक्षोभ आता राजस्थानकडे सरकला आहे. त्यातच अरबी व बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानजवळ तयार झालेल्या विक्षोभाजवळच एकमेकांना आदळत आहेत. यामुळे महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, यामुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, अजून ११ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून, किमान तापमान देखील १८ ते २० अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे.