शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
5
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
6
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
7
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
8
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
9
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
10
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
11
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
12
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
13
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
14
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
15
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
16
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
17
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
18
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
19
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
20
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 

कापूस, सोयाबीननंतर आता केळीचेही मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 7:12 PM

अनेक भागात हानी : वादळी पावसाने गाढोदा, कठोरा, किनोद भागात केळीला फटका

जळगाव : अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे केळीला कोणताही फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री तालुक्यातील गाढोदा, कठोरा, किनोद, भादली भागात झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या कांदेबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन काढणीवर असलेले केळीचे घड कोसळले असल्याने केळी उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे.यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्यामुळे शेतकºयासमोर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व कापूसचेच नुकसान झाले होते. केळीला तसा जास्त पावसाचा फायदाच झाला होता. मात्र, अरबी समुद्रावर आलेल्या माहा चक्रीवादळाच्या परिणामस्वरुप गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. कठोरा, भादली, सावखेडा या भागात मोठे नुकसान झाले आहे. तर आव्हाणे, गाढोदा, पळसोद या भागातही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.केळीचे झालेल्या नुकसानामुळे प्रशासनाने तत्काळ उध्वस्त झालेल्या केळीच्या बागांमध्ये जावून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी कठोरा येथील शेतकरी गोकुळ मोहन जाधव यांनी केले आहे. गाढोदा परिसरात देखील निलेश रामचंद्र पाटील यांच्या केळीचाही बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस काढण्यासाठी मोठी कसरत सुरुशेतांमध्ये कापूस फुलला आहे अनेक ठिकाणी कापसाचे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या भागात कापूस शेतांमध्ये फुलला आहे. तो कापूस वेचताना शेतकरी व मजूरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शेतरस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी शेतापर्यंत नेता येत नाही. त्यातल्या त्यात कापूस वेचणीसाठी मजूर शेतामध्ये जरी पोहचले तरी चिखलामुळे पाय शेतांमध्ये रुतत असल्याने कापूस वेचणी करताना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव