शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

किसान रेल्वेच्या १०० फेऱ्यांमधून सहा कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:14 AM

सुविधा : भुसावळ विभागातून १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक १७ हजार टन मालाची वाहतूक लोकमत ...

सुविधा : भुसावळ विभागातून १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक

१७ हजार टन मालाची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शेतकरी बांधवांच्या कृषीमालाला इतर राज्यांतील बाजारपेठांमध्ये जादा भाव मिळून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, यातून भुसावळ रेल्वे प्रशासनाला सहा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक या किसान रेल्वेद्वारे करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी ७ ऑगस्टपासून भारतातील पहिली किसान रेल्वे नाशिक स्टेशनजवळील देवळाली ते दानापूरदरम्यान धावली. या किसान रेल्वेमुळे भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ या भागांतील शेतकऱ्यांना बिहार राज्यातील दानापूरपर्यंत आपला भाजीपाला, फळे व इतर मालाची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. परराज्यात कांदा, लिंबू, द्राक्ष, पेरू , संत्री व इतर भाजीपाल्याला जास्त भाव मिळत असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरीबांधव या गाडीने परराज्यात आपल्या मालाची वाहतूक करीत आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने ज्या ठिकाणाहून शेतकरी मालाची वाहतूक करतील, त्या ठिकाणच्या जवळील रेल्वेस्टेशनवरही ही किसान रेल्वे पाठविण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच खासगी वाहतुकीपेक्षा अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक होत असल्याने शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गाडीला मिळत आहे.

इन्फो :

आतापर्यंत १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक

या किसान रेल्वे मालगाडीच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आतापर्यंत या मालगाडीच्या माध्यमातून विविध भागातील शेतकऱ्यांनी १७ हजार ३३ टन इतक्या कृषी मालाची वाहतूक केली आहे. यातून रेल्वे प्रशासनाला ५ कोटी ९७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, या गाडीने नाशिक स्टेशनवरून सर्वाधिक कृषी मालाची वाहतूक झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

दररोज सेवा असल्यास शेतकऱ्यांचा फायदा

रेल्वे प्रशासनातर्फे गेल्यावर्षी कोरोनाकाळात सुरू केलेली ही किसान एक्सप्रेस सध्या मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी या तीनच दिवशी धावत आहे. त्यामुळे शेतकरीबांधवांना पुरेशी मालाची वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. जर रेल्वे प्रशासनाने दररोज किसान रेल्वेची सेवा सुरू ठेवली तर उत्पन्नात दुप्पटीने वाढ होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.