शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

२७ दिवस पॉझिटिव्हिटी एक टक्क्याच्या खाली स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हा गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून घसरला आहे. गेल्या दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हा गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून घसरला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या बाधितांच्या प्रमाणांचा विचार केला असता. गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रमाण एक टक्का आणि नंतर त्यापेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. गेल्या २७ दिवसांपासून कोरोनाची पॉझिटिव्हिटी ही एक टक्क्याच्या खाली स्थिर आहे.

जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ही जुलैत ०.२५ टक्के नोंदविली गेली आहे. हे प्रमाण त्या मानाने कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याच भागात मोठी वाढ आढळून आलेली नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेनंतरची स्थिती सुधारली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अंतरामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कधीच शंभराच्या खाली गेली नव्हती, मात्र, दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्यादेखील ८४वर पोहोचली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून परिस्थिती आटोक्यात असल्याचे समाधानकारक चित्र जिल्हाभरात आहे.

२७ दिवसांत २६३

जुलै महिन्यात एकत्रित २७ दिवसात २६३ रुग्ण समोर आले आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्क्यांवर आले आहे. जून महिन्यात २३०० रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, गेल्या महिनाभरात सरासरी रोज नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हे प्रमाण दहापेक्षा कमी असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसते. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही. यात बोदवड, पारोळा आणि एरंडोल या तालुक्यांचा समावेश आहे.

पाच मृत्यू

महिनाभरात कोरोनाबाधितांचे पाच मृत्यू झाले आहेत. जून महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले आहे. जून महिन्यात ४८ मृत्यू झाले होते. मृत्यूचे प्रमाणही घटत असल्याचे यावरून समोर येत आहे.

पॉझिटिव्हिटी अशी

मे : आरटीपीसीआर चाचण्या : ७४,७६९, बाधित ५२७३, पॉझिटिव्हिटी : ७.०५ टक्के

जून : आरटीपीसीआर चाचण्या : ७६,८२३, बाधित : ८५४, पॉझिटिव्हिटी : १.११ टक्के

जुलै : आरटीपीसीआर चाचण्या : ४६,३०० बाधित : १२० पॉझिटिव्हिटी : ०.२५ टक्के

पहिला पॅटर्न काय सांगतो

कोरोनाची पहिली लाट ही साधारण ऑक्टोबर महिन्यापासून ओसरू लागली होती. डिसेंबरअखेर व जानेवारी महिन्यात ती अगदी कमी होती. मात्र, १५ फेब्रुवारीपासून रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. पहिली लाट ओसरल्याने व दुसरी लाट सुरू होणे यात ३ ते ४ महिन्यांचा अवधी होता. दुसऱ्या लाटेत एप्रिलअखेरपासून रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यात जुलै महिन्यात रुग्णसंख्या कमी झालेली आहे. हा पॅटर्न बघता ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबर महिन्यात कशी परिस्थिती राहते यावर तिसरी लाट अवलंबून असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, ठोस अद्याप कोणाकडेच याचे उत्तर नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.