शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: February 13, 2015 15:32 IST

जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील १५ पैकी दहा तालुक्यातील १७ हजार १२९ हेक्टरला फटका बसला आहे.

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील १५ पैकी दहा तालुक्यातील १७ हजार १२९ हेक्टरला फटका बसला आहे. गहू, मका, ज्वारी, केळी आदी पिकांचे सुमारे दोन कोटी ७ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल सहाशे गावातील १६ हजार ८0७ शेतकर्‍यांना फटका बसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किसन मुळे यांनी सांगितले.
सर्वाधिक नुकसान धरणगाव तालुक्यात
अवकाळी पावसानंतर लागलीच दुसर्‍या दिवशी कृषि विभागातर्फे पंचनामे करण्यात आले. यात सर्वाधिक फटका हा धरणगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश प्रशासनाला अद्याप मिळालेले नाहीत. 
गहू व मक्याचे प्रचंड नुकसान
सर्वाधिक तडाखा गहू व मक्याला बसला आहे. जिल्ह्यातील ९ हजार ४३८ हेक्टरवरील गहू तर सहा हजार ९0 हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. 
आठवडाभरात निर्णय- कृषिमंत्री
धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना शासनाने निश्‍चित केलेल्या निकषानुसार नुकसानग्रस्तांना भरपाईदिली जाईल. पंचनामे तीन दिवसात आटोपतील. लागलीच भरपाईदेखील दिली जाईल. परंतु नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कर्जव इतर मद्दय़ांबाबत आणखी काही सवलती द्यायच्या का? यासंदर्भात मंत्रीमंडळासमोर चर्चाकरून आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 
शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.