शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

मंठा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ...

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आजवर तालुक्यातून एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झालेला नाही. ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी तगडे उमेदवार आपल्याच पॅनलमध्ये यावेत, कागदपत्रांची पूर्तता असावी, याकडे पॅनलप्रमुखांचा कल आहे. शिवाय निवडणुकीतील विजयासाठी आतापासूनच व्यूहरचना आखल्या जात आहेत.

प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. परंतु, एकाही गावातून वैयक्तिक किंवा पॅनलमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुक गर्दी करीत आहेत. तर निर्माण होणाऱ्या शंकाचे निरसन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहे. सध्या गावपातळीवर कार्यकर्ते एकमेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात, भावकीची मनधरणी करण्यात आणि पॅनलची जुळवाजुळव करण्यातच मग्न आहेत. कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे कोणा- कोणाला पॅनलमध्ये घेणार ? असा प्रश्न पॅनलप्रमुखांना पडला आहे. इच्छुकांना नाराज केले तर बंडखोरी होण्याची शक्यताही अनेक ठिकाणी वर्तविली जात आहे. हे बंडखोर विरोधी गटात सामील झाले तर पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे.

तालुक्यावर काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांची चांगली पकड आहे. त्यामुळे या निवडणुका काँग्रेस गटासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. मंठा तालुक्यात मागील पंचवार्षिकमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडल्यामुळे दोन गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. तर तीन गावांमध्ये सदस्य बिनविरोध, तर फक्त सरपंचांच्याच निवडीसाठी मतदान घेण्यात आले होते. परंतु यावेळी होऊ घातलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत यावी, यासाठी नेतेही प्रयत्न करत आहेत.

मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष

इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. हे करताना मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, मतदार यंदा कोणाला ग्रामपंचायतीत बसवितात हे १८ जानेवारी रोजी समोर येणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी होणार आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. याच दिवशी दुपारी इच्छूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करुन त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.