शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उगवेना, युरियाची टंचाई; हिरवी स्वप्न भंगण्याची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 20:05 IST

पेरणी केलेल्या पिकांना आता वाढीसाठी पावसाची गरज आहे. 

ठळक मुद्देबळीराजाचे डोळे आभाळाकडे  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जालना :  जालना जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस जोरदार झाला तसेच मृग नक्षत्राने देखील प्रारंभी चांगली हजेरी लावून शेतकºयांचा उत्साह वाढविला होता. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांची हिरवी  स्वप्न भंगण्याची भीती निर्माण झाली असून, जिल्ह्यात मंगळवार पर्यंत जवळपास ६० टक्के पेरणी उरकली असून, आता पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाचे क्षेत्र हे एकूण पाच लाख ७० हजार हेक्टर आहे. त्यात सोयाबीन, कपाशी, तूर आदींची मोठ्या प्रमाणावर पेरणी शेतकºयांनी सुरूवातीच्या पावसातच केली. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, त्यानुसार त्याचा श्रीगणेशाही झाला होता. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस, नंतर अवकाळीचा फटका यामुळे खरीप आणि रबी हंगाम असे दोन्ही शेतकºयांच्या हातातून गेले होते. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडून पिके चांगली येतील या आशेवर शेतक-यांनी कडक उन्हाची तमा न बाळगता शेतं पेरण्यासाठी तयार करून ठेवली होती. 

पूर्वमोसमी पाऊस आणि नंतर मृगाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली. काहींच्या शेतात पाणी घुसल्याने केलेली पेरणी वाहून गेली. तर काही भागात समाधानकार पाऊस पडून बियाणांनी जमनितून डोके वर काढले होते. त्यामुळे शेतात शेतक-यांना पुन्हा नवीन उमेद दिसत होती. परंतु गेल्या आठ दिवसां पासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खºया अर्थान यंदा जून महिन्यात चांगला पाऊस झाला असून, जूनची सरासरी देखील पावसाने ओलांडली आहे. असे असतांनाच नंतर कडक उन पडल्याने तापमानात वाढ होऊन जमिनितील ओल सुकली आहे. यामुळे पेरणी केलेल्या पिकांना आता वाढीसाठी पावसाची गरज आहे. 

क्षमता तपासलीजिल्ह्यात यंदा कृषी विभागाने यंदा खरीपाची तयारी करण्यासाठी कंबर कसली होती. मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होणार हे माहित असल्याने शेतकºयांनी त्यांच्या घरात असलेली बियाणे वापरण्यावर भर दिला आहे. या घरातील बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी जवळपास एक हजार गावांमध्ये विशेष उपक्रम कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी राविला. त्याचे रिपोर्ट चांगले असून, जवळपास ६० टक्के बियाणांची उगवण क्षमता ही चांगली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान काही खाजगी कंपन्या आणि महाबीजच्या बियाणांची उगवन क्षमता चांगली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती हाती आली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीJalanaजालना