शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:13 AM

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी भाजपच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे राजकारण म्हटले की मिलीजुली सरकार, असा सर्वत्र समज पसरला आहे. आणि तो काही अंशी खरा देखील आहे. येथे कोणताच राजकारणी कोणाचे उणे-दुणे काढत नाही. जियो और जीने दो या तत्त्वानुसार जालन्याच्या राजकारणाची दिशा असल्याने अनेक महत्वाच्या मुद्यावर ना विरोधक सडकून टीका करत ना सत्ताधारी विरोधकांची लक्तरे वेशीवर टांगत. त्यामुळे शहरातील कोट्यवधी रूपये खर्च होऊन सुरू असलेल्या कामांच्या दर्जावर त्याचा परिणाम सर्वसामान्यांना दिसतो. परंतु आपला मुद्दा उचलणारे नेतृत्व नसल्याने चलता है.. म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एक ते दीड तास जालन्यात आले होते. त्यांना दिल्लीला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी भाजपच्या सर्व नगरसेवकांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी जवळपास सर्व नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच गेल्या चार ते पाच वर्षात आपण विविध योजनेतून शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणला. परंतु काही नगरसेवकांनी हा निधी खर्च करतांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्याशी जुळवून घेतल्याची चर्चा आहे.तसेच त्यांना हवे तसे प्रस्ताव तयार करून घेऊन निधी मिळवून घेतल्याचे आपल्या लक्षात आल्याचे दानवेंनी सांगत आपण गोट्या खेळत नसल्याचे सांगितले.एकूणच या दानवेंच्या रौद्र रूपाने नगरसेवकांना घाम न फुटल्यास नवल. पालिकेतील विविध मुद्यांवरून सध्या प्रश्न गाजत आहेत. या कडे लक्ष देण्यासह हे सर्व मुद्दे तयार करून घेऊन नगरविकास विभागाच्या सचिवांकडे ते द्यावेत जर त्यात काही गौडबंगाल असेल त्याची चौकशी आपण लावू, अशी स्पष्ट भूूमिकाही त्यांनी घेतली. विशेष म्हणजे जालन्याची नगर पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात असल्याने युतीचे नेते अर्थात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दक्ष आहेत.खोतकर यांनी जालना पालिकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच नेते आपले अस्तित्व पणाला लावत असल्याचे दिसून येते. आपल्या अल्पशा विश्राम काळात केंद्रीय मंत्री जाम चिडल्याने नगरसेवकांमध्ये चर्चेला उधाण आले होते.विशेष म्हणजे, यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही दानवेंनी चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा भाजपमध्येच दबक्या आवाजात चर्चिली जात आहे.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेJalana Muncipalityजालना नगरपरिषदPoliticsराजकारणBJPभाजपा