शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्रावर वाहनधारक शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात ...

बैलगाड्यांना प्राधान्य : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर दिवसभरात पाचशे क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहनधारक शेतकऱ्यांना अनेक दिवस ताटकळत थांबावे लागत आहे. यात वाहनांच्या भाड्याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राजूर येथील कापूस खरेदी केंद्र १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. यानंतर १६ डिसेंबर रोजी कापूस साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कारण सांगून कापसाची खरेदी बंद करण्यात आली होती. याचा शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन कापूस खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. परंतु, खरेदी केंद्रावर सीसीआयचे अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात पाचशे क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यात बैलगाड्यांना प्राधान्य असल्याने ट्रॅक्टर, टेम्पो वाहनातून आणलेल्या कापसाची खरेदी रखडून पडत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी किरायाने वाहने आणली आहेत. यातच दहा ते बारा दिवस मोजमाप होत नसल्याने शेतकऱ्यांना किरायाच्या वाहनांचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. असे असतानाही खरेदी केंद्रावर उशिरा कापूस खरेदी केली जात असून, सायंकाळी लवकर खरेदी बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सीसीआय जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बुधवारपर्यंत केंद्रावर २०७ वाहनांची नोंद झालेली असून, खरेदी केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सीसीआयने दिवसभरात कापसाची खरेदी वाढवण्यासह गती द्यावी, अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवाजी ढाकणे, रामेश्वर नागवे, विलास मीसाळ, गोरख मोरवळे, ऋषिंदर बनकर, दत्ता काफरे, आत्माराम नागवे, शिवाजी सहाने, नानासाहेब ढाकणे, देविदास नागवे, विठ्ठल शेजुळ, आण्णा ढाकणे, समाधान ढाकणे, दत्तू बकाल, सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण कढवणे, दौलतराव नागवे यांच्यासह ४५ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.