शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सोने तारण ठेवून मजूर शहराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:50 IST

यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात अनेक कुटूंब हे स्थलांतर करून मोठ्या शहरात जात आहेत. जवळ जे काही सोने-नाणे आहे, ते सोबत घेऊन जाण्यापेक्षा ते बँकेत तारण ठेवून त्यावर गोल्डलोन काढून रोख पैसे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून राष्ट्रीयीकृत बँक आणि खासगी वित्तीय संस्थांकडे सोने तारण ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.सोने हा मौल्यवान धातू असल्याने त्याला मोठी मागणी आणि तेवढीच त्याची किंमत जास्त आहे. आपल्याकड सोन्याला रोखीपेक्षाही मोठे महत्व असते. तो वाहून नेण्यास सोपा असण्यासह त्याची किंमत क्वचितच कमी होते. त्यामुळे सोन्याला अनन्य महत्व भारतींयामध्ये आहे. गरीबातील गरीबही सोने खरेदीसाठी जिवाचे रान करून बचत करतो, आणि त्यातून थोडे का होईना सोने हे खरेदी करतो.महिलांमध्ये तर या धातूची आवड त्याचे महत्व हे त्या जाणून असतात. अर्ध्यारात्री कामा येणारे सोने म्हणूनच त्याला संबोधले जाते.जालना जिल्ह्यात दुष्काळी वातावरण असल्याने आज ग्रामीण भागात हाताला काम नसल्याने अनेक कुंटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे, तसेच अन्य मोठ्या शहरात स्थलांतर करत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे असलेले थोडेबहूत सोने हे बँकांमध्ये तारण ठेवून गोल्डलोन घेण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील काही राष्ट्रीयकृत बँकांकडे सोने ठेवण्यासाठी लॉकर कमी पडत असल्याचे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकाने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले. सोने तारण योजनेचे अनेक फायदे असून, त्यावर काढलेले कर्ज हे परतफेड करताना त्याचा कालावधी जास्त असून, व्याजदरही कमी आहेत.पूर्वी खासगी सावकाराकडे शेतजमिन गहाण ठेवण्याचे प्रमाण होते, परंतु आता खासगी सावकाराचे व्याजाचे दर हे न परडवणारे नसून, त्यांची पठाणी वसुली ही देखील गंभीर बाब असल्याने लोकांचा कल हा बँकांकडे वाढल्याचेही सांगण्यात आले.स्थलांतराची माहिती देत नाहीतआज दुष्काळामुळे अनेकजण गावातून शहराकडे जात आहेत. मात्र हे कुटुंब बाहेरगावी जाताना त्यांनी त्याची माहिती ही संबंधित ग्रामपंचायतला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याची तसदी कोणी घेत नसून, आम्ही रोजगाराच्या शोधात जात आहोत, हे कारण सांगणेदेखील सामाजिकदृष्ट्या चांगली बाब नसल्याने अनेक जण पूर्वकल्पना न देताच गाव सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एकूणच शहरात गेल्यावर तेथे निवासाचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो.

टॅग्स :Migrationस्थलांतरणdroughtदुष्काळ