शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:34 IST

सोने स्वस्त, तर चांदीचे दर स्थिर जालना : मागील आठवड्यात अंदाज वर्तविल्यानुसार तेल, तुपाच्या दरात विक्रमी तेजी आली. ...

सोने स्वस्त, तर चांदीचे दर स्थिर

जालना : मागील आठवड्यात अंदाज वर्तविल्यानुसार तेल, तुपाच्या दरात विक्रमी तेजी आली. सर्व प्रकारच्या डाळी, शेंगदाना, साबूदाणा देखील महागला. सोयाबीन आणि हरभऱ्यांचेही दर वाढले. सोने मात्र काही प्रमाणात स्वस्त झाले असून, चांदीचे दर स्थिर आहेत. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी खाद्य तेलाची आयात थांबविणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. त्याचवेळी तेल, तुपाच्या दरात मोठी वाढ होणार, याचा अंदाज आला होता. त्याप्रमाणे तेलाच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची, तर तुपाच्या दरात डब्यामागे १०० रुपयांची तेजी आली. तेजीची घोडदौड पुढेही सुरूच राहील, असे बोलले जाते. सध्या तेलावरील आयात शुल्क वाढविल्यामुळे आणि रुपया कमजोर झाल्यामुळे तेलाच्या दरात तेजी आली, असे काही जाणकारांचे मत आहे.

पामतेल १२५००, सोयाबीन तेल १२८००, सरकी तेल १२८००, सूर्यफूल तेल १५८००, करडई तेल १७००० आणि शेंगदाणा तेलाचे दर १६००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. वनस्पती तुपाचे दर १५०० ते १७०० रुपये प्रतिडबा असे आहेत.

सर्व प्रकारच्या डाळी प्रत्येकी २०० रुपयांनी महागल्या. हरभरा डाळ ५६०० ते ५९००, मूग डाळ ९००० ते ९७००, उडीद डाळ ९००० ते १०००० आणि मसूर डाळीचे दर ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

पुढील आठवड्यात महाशिवरात्र असल्यामुळे शेंगदाणा, साबुदाणा तसेच उपवासाचे पदार्थ महागले आहेत. शेंगदाणा ९५०० ते १०५००, तर साबुदाण्याचे दर ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

गुळाची आवक दररोज ५ हजार भेली इतकी असून, भाव २६७५ ते ३१५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. साखरेचा मार्च महिन्याचा कोटा २१ लाख टन इतका जाहीर करण्यात आला. त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणात राहतील, असा अंदाज आहे. सध्या साखरेचे दर ३२५० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ५०० पोते इतकी असून, २०० रुपयांच्या तेजीनंतर भाव ४९५० ते ५०५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्धता कमी असल्यामुळे सोयाबीनच्या दरात तेजी आल्याचे बोलले जाते.

सटाेरियांची पकड मजबूत झाल्यामुळे हरभऱ्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. चालू रब्बी हंगामात महाराष्ट्रात हरभऱ्याचे उत्पादन २४.६७ लाख टन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. मात्र तरीही हरभरा महागणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या हरभऱ्याची आवक दररोज ८०० पोते इतकी असून, १५० रुपयांच्या तेजीनंतर भाव ४४०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. येत्या १५ मार्चपासून देशभरात सरकारच्या वतीने हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात येईल, असे कळते.

मागील काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. सध्या सोने तोळ्यामागे २ हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, भाव ४८ हजार रुपये प्रतितोळा असे आहेत. चांदीचे दर स्थिर म्हणजे ७० हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत. चांदीच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

गव्हाची आवक दररोज ८०० पोते इतकी असून, भाव १६५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १२०० पोते इतकी असून, भाव ११५० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. बाजरीची आवक दररोज २०० पोते इतकी असून, भाव ११४० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. मक्याची आवक दररोज ५०० पोते इतकी असून, भाव १२५० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज १००० पोते इतकी असून, भाव ६४०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.