शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST

जालना : विविध कारणांमुळे घाणेवाडी जलाशयातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे येथे शासनाने सुरू केलेल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन ...

जालना : विविध कारणांमुळे घाणेवाडी जलाशयातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे येथे शासनाने सुरू केलेल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजनेतून कामे केली जात असून, या प्रकल्पाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.

बाष्पीभवन नियंत्रण, साठवण पुन:स्थापना आणि इतर लाभांसाठी महाराष्ट्र शासनाने माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यातील तंत्रज्ञान कामाचा बुधवारी आमदार गोरंट्याल यांच्या हस्ते घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयाजवळ शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संगीत गोरंट्याल, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पुनम स्वामी, न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे नगर अभियंता राजेश बगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी देशातील नव्हे तर जगातील पहिला पायलट प्रकल्प राबवण्यात येत आहे. जलाशयाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून या परिसरातील झाडे- झुडपे तोडून घेण्यात आली आहेत. असे असले तरी हा तलाव यापुढे शंभर वर्षे जिवंत राहिला पाहिजे. बाष्पीभवनामुळे तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जात आहे. हे पाणी वाया न जाता तेही उपयोगात यावे म्हणून सर्वात प्रथम हा पायलट प्रकल्प राबविला जात असल्याचेही गोरंट्याल यांनी सांगितले.

साठवण क्षमता वाढीसाठी प्रयत्न

या प्रकल्पांतर्गत तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याबरोबरच साठवण क्षमता वाढविणे व इतर विकास कामे केली जाणार आहेत. तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी संबंधित कंपनी कोणत्याही केमिकलचा वापर न करता नैसर्गिकरीत्या हे काम करणार आहे. या प्रकल्पामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच तलावाची साठवण क्षमता वाढण्यासदेखील मदत होणार आहे. यासाठी रवींद्र पाठक, अर्जुन पाठक, रोहित घोडे, मयुरेश्वर भानुशाम, कुणाल लिंभोरे आदी स्थापत्य अभियंते काम पाहत आहेत.

(फोटो)