शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीकडून मदत मिळणार की नाही, शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

भोकरदन : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी नुकसान भरपाईपोटी खरिपात पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करून कोटी रुपयांचा विमा उतरून ...

भोकरदन : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी नुकसान भरपाईपोटी खरिपात पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करून कोटी रुपयांचा विमा उतरून घेतला आहे. अतिवृष्टीत खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे महसूलकडून पिकांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. शासनानेदेखील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात १९ कोटी ११ लाख ८३ हजार रुपयांची मदत दिली आहे. ती रक्कम अदा करण्यास बँकांकडून सुरुवात करण्यात आली असली तरी झालेल्या नुकसानाचा पीक विमा मिळणार की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत.

सततची नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे पडणारा दुष्काळ लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळात मदत करता यावी म्हणून २०१६-२०२७ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना अमलात आणली. शेतकऱ्यांचादेखील कल विमा भरण्याकडे दिवसेंदिवस वाढत गेला. यात भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. २०१९-२०२० मध्ये खरिपात १५७ गावातील शेतकऱ्यांनी रिलायन्स कंपनीकडे उसनवारी करून पिकांचा विमा उतरविला. यात सोयाबीन, कपाशी, मका, तूर, मूग, उडीद अशा खरीप पिकांवर संरक्षण कवच म्हणून पीकविमा उतरविला; मात्र सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ न सोडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. यात खरीप पिकांचे एक लाख हेक्टरच्यावर क्षेत्र बाधित झाले. शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनानेदेखील पंचनामे करून सदर प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित केला असता, शेतमालाची आणेवारी ५० टक्केच्या आत आली. त्यानुसार दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाची मदत जाहीर करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग केली; परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळते की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत.

खरिपात शेतातील विविध पिकांवर मोठी तजवीज करून पाच हजार रुपयांचा पीकविमा उतरविला होता; मात्र अतिवृष्टीच्या पावसात सगळेच धुवून निघाले. यासाठी पीकविमा मंजूर होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित विभागाकडे मागणीदेखील केली आहे. नुसती उडवाउडवीचे उत्तरे ऐकायला मिळत आहेत. याकडे शासनानेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे.

अरुण देशमुख, शेतकरी, भोकरदन.