शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती प्रक्रियेबाबत युवकांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST

जालना : पोलीस भरती प्रक्रिया होणार असली तरी भरती प्रक्रियेबाबत विविध जी आर निघत आहेत. पोलीस भरतीबाबत शासन स्तरावरून ...

जालना : पोलीस भरती प्रक्रिया होणार असली तरी भरती प्रक्रियेबाबत विविध जी आर निघत आहेत. पोलीस भरतीबाबत शासन स्तरावरून सतत विविध जी आर प्रसिध्द केले जात असल्याने भरतीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने मेगा पोलीस भरतीचे आश्वासन देत भरती प्रक्रिया राबविण्याचे जाहीर केले होते. मात्र, कोरोनासह इतर विविध कारणांनी ही भरती प्रक्रिया पूर्णत्वास येऊ शकली नाही. त्यात सध्या शासनाने एकीकडे पोलीस भरती होणार असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे भरतीचा जी आर रद्द केला आहे. त्यामुळे शासन स्तरावरून पोलीस भरती होणार की भरतीची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार ? या प्रश्नाने भरतीसाठी गत तीन

-चार वर्षापासून प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, शासन स्तरावरून वेळेत भरती प्रक्रिया न झाल्याने भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक मुला- मुलींचे वयही शासकीय अटीच्या पुढे गेले आहे.

पोलीस भरतीकडे मोठ्या आशा लावून दिवसरात्र अनेक युवक- युवती मैदानावर घाम गाळण्यासह पुस्तकांचा अभ्यासही करीत आहेत. त्यामुळे शासनाने भरती प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय त्वरित घेऊन भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी हे युवक करीत आहेत.

जिल्ह्यात ११११ लोकांमागे एक पोलीस

जालना जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखाच्या पुढे आहे. मात्र जिल्हा पोलीस दलात केवळ १८०० च्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या आणि उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या पाहता तब्बल एक हजार १११ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी राहत आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे.

शिक्षण सुरू असताना पाहिलेले पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मागील चार वर्षापासून तयारी करीत आहे. शासन स्तरावरून पोलीस भरती जाहीर करण्यात आली. मात्र, भरती प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. भरतीची तयारी करणाऱ्या युवकांचा विचार करून शासनाने भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी.

- आनंद म्हस्के

साळेगाव, जालना

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे बहुतांश मुले- मुली हे ग्रामीण भागातील आहेत. एकीकडे आस्मानी संकटांमुळे शेतीचे घटलेले उत्पन्न आणि कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत न होणारी आहे. अशा स्थितीतही मुलांच्या तयारीसाठी पालक खर्च करीत आहेत. त्यामुळे विना विलंब पोलीस भरती करणे गरजेचे आहे.

- संतोष ढाकणे

चांदई एक्को, भोकरदन

मी गत तीन वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. समोर उभा असलेल्या अनेक समस्यांवर मात करीत माझ्यासारखे इतर मुले तयारी करीत आहोत. त्यामुळे शासनाने या युवकांना दिलासा देण्यासाठी भरती प्रक्रिया राबवावी.

- नितेश चव्हाण, नेर, जालना