शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मृत जलसाठ्यावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:41 IST

भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.उत्तर भोकरदन परिसरातील सर्व लहान- मोठी धरणे सध्या आटली आहेत. केवळ पद्मावती धरणातच मृतजलसाठा शिल्लक राहिला आहे.दुष्काळामुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहे. सर्व जलस्त्रोत आटले असल्याने टँकरवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी पद्मावती धरणाच्या परिसरात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.यावरून दररोज ५० टँकरद्वारे भोकरदन तालुक्यातील धावडा, सुंदरवाडी, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, अवघडराव सावंगी, आन्वा, वालसावंगी आदी व बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव, तराडखेड, कुम्मणी, देवूळघाट यासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. यामुळे धरणात केवळ दीड महिना टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.याबाबत सरपंच रंजना आहेर म्हणाल्या, सद्य स्थितीत गावातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, येणाऱ्या काळ कठीण जाण्याची शक्यता असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होऊ नये, यासाठी उपाय- योजना करणे सुरू आहे. तसेच परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमणात कामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यावर पाणी मारण्यासाठी देखील येथूनच टँकर भरून नेले जात आहेत.१० विहिरी अधिग्रहण, सात टँकर सुरूपरतूर : तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र होऊ लागली असून, आता पर्यंत १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत.तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणी टंचाईचे चित्र गडद होऊ लागले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरी, बोअर, तलाव कोरडे पडत आहेत. एप्रिल मध्ये होणारी पाणी टंचाई यावर्षी फेब्रुवारी च्या सुरुवातीपासूनच जाणवू लागली आहे. विहीर अधिग्रहण व टँकरसाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. काही गावाला तर टँकरसाठी उपोषणही करावे लागत आहे.सुरूमगावला उपोषणा नंतरच टँकर सुरू करण्यात आले. सद्या तालुक्यात ७ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरसाठी ११ प्रस्ताव आले आहेत. यापैकी लिखित पिंप्री, परतवाडी, ढोकमाळ तांडा, कºहाळा, खांडवी वाडी, सुरूमगाव या सहा गावांना टँकर सुरू आहे. तर शेवगा या गावाला वर्षभर टँकरने पाणी सुरू आहे. या गावातील पाणी घातक क्षार युक्त असल्याने ते पिण्यास योग्य नाही. तर विहीर अधिग्रहणासाठी एकूण २६ प्रस्ताव आले आहेत.यापैकी १९ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ