शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

मृत जलसाठ्यावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:41 IST

भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.उत्तर भोकरदन परिसरातील सर्व लहान- मोठी धरणे सध्या आटली आहेत. केवळ पद्मावती धरणातच मृतजलसाठा शिल्लक राहिला आहे.दुष्काळामुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहे. सर्व जलस्त्रोत आटले असल्याने टँकरवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी पद्मावती धरणाच्या परिसरात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.यावरून दररोज ५० टँकरद्वारे भोकरदन तालुक्यातील धावडा, सुंदरवाडी, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, अवघडराव सावंगी, आन्वा, वालसावंगी आदी व बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव, तराडखेड, कुम्मणी, देवूळघाट यासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. यामुळे धरणात केवळ दीड महिना टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.याबाबत सरपंच रंजना आहेर म्हणाल्या, सद्य स्थितीत गावातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, येणाऱ्या काळ कठीण जाण्याची शक्यता असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होऊ नये, यासाठी उपाय- योजना करणे सुरू आहे. तसेच परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमणात कामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यावर पाणी मारण्यासाठी देखील येथूनच टँकर भरून नेले जात आहेत.१० विहिरी अधिग्रहण, सात टँकर सुरूपरतूर : तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र होऊ लागली असून, आता पर्यंत १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत.तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणी टंचाईचे चित्र गडद होऊ लागले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरी, बोअर, तलाव कोरडे पडत आहेत. एप्रिल मध्ये होणारी पाणी टंचाई यावर्षी फेब्रुवारी च्या सुरुवातीपासूनच जाणवू लागली आहे. विहीर अधिग्रहण व टँकरसाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. काही गावाला तर टँकरसाठी उपोषणही करावे लागत आहे.सुरूमगावला उपोषणा नंतरच टँकर सुरू करण्यात आले. सद्या तालुक्यात ७ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरसाठी ११ प्रस्ताव आले आहेत. यापैकी लिखित पिंप्री, परतवाडी, ढोकमाळ तांडा, कºहाळा, खांडवी वाडी, सुरूमगाव या सहा गावांना टँकर सुरू आहे. तर शेवगा या गावाला वर्षभर टँकरने पाणी सुरू आहे. या गावातील पाणी घातक क्षार युक्त असल्याने ते पिण्यास योग्य नाही. तर विहीर अधिग्रहणासाठी एकूण २६ प्रस्ताव आले आहेत.यापैकी १९ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ