शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
3
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
4
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
5
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
6
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
7
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
8
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
9
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
10
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
11
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
12
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
13
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
14
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
15
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
16
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
17
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
18
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
19
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
20
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मृत जलसाठ्यावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:41 IST

भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.उत्तर भोकरदन परिसरातील सर्व लहान- मोठी धरणे सध्या आटली आहेत. केवळ पद्मावती धरणातच मृतजलसाठा शिल्लक राहिला आहे.दुष्काळामुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहे. सर्व जलस्त्रोत आटले असल्याने टँकरवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी पद्मावती धरणाच्या परिसरात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.यावरून दररोज ५० टँकरद्वारे भोकरदन तालुक्यातील धावडा, सुंदरवाडी, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, अवघडराव सावंगी, आन्वा, वालसावंगी आदी व बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव, तराडखेड, कुम्मणी, देवूळघाट यासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. यामुळे धरणात केवळ दीड महिना टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.याबाबत सरपंच रंजना आहेर म्हणाल्या, सद्य स्थितीत गावातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, येणाऱ्या काळ कठीण जाण्याची शक्यता असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होऊ नये, यासाठी उपाय- योजना करणे सुरू आहे. तसेच परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमणात कामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यावर पाणी मारण्यासाठी देखील येथूनच टँकर भरून नेले जात आहेत.१० विहिरी अधिग्रहण, सात टँकर सुरूपरतूर : तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र होऊ लागली असून, आता पर्यंत १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत.तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणी टंचाईचे चित्र गडद होऊ लागले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरी, बोअर, तलाव कोरडे पडत आहेत. एप्रिल मध्ये होणारी पाणी टंचाई यावर्षी फेब्रुवारी च्या सुरुवातीपासूनच जाणवू लागली आहे. विहीर अधिग्रहण व टँकरसाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. काही गावाला तर टँकरसाठी उपोषणही करावे लागत आहे.सुरूमगावला उपोषणा नंतरच टँकर सुरू करण्यात आले. सद्या तालुक्यात ७ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरसाठी ११ प्रस्ताव आले आहेत. यापैकी लिखित पिंप्री, परतवाडी, ढोकमाळ तांडा, कºहाळा, खांडवी वाडी, सुरूमगाव या सहा गावांना टँकर सुरू आहे. तर शेवगा या गावाला वर्षभर टँकरने पाणी सुरू आहे. या गावातील पाणी घातक क्षार युक्त असल्याने ते पिण्यास योग्य नाही. तर विहीर अधिग्रहणासाठी एकूण २६ प्रस्ताव आले आहेत.यापैकी १९ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ