शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बालपण गुन्हेगारीत अडकतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : आज विविध गुन्हेगारी कृत्यामुळे अल्पवयीन मुले आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत आहेत. हाणामारीतील काही तक्रारी पोलीस ठाण्यात ...

जालना : आज विविध गुन्हेगारी कृत्यामुळे अल्पवयीन मुले आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत आहेत. हाणामारीतील काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होतात. तर अनेक तक्रारींमध्ये पोलीस आपापसात समेट घडविला जातो. समेट घडविताना पोलिसांकडून मुलांसह पालकांचे समुपदेशन केले जाते. परंतु, विविध कारणांनी अल्पवयीन मुले आरोपी होण्याचे प्रकार सुरूच आहे.

स्पर्धेच्या युगात मुलांकडे लक्ष द्यायला पालकांकडे वेळ नाही. कोणी नोकरीला, कोणी मजुरीला तर कोणी इतर कामानिमित्त घरातून बाहेर असतो. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी महिलाही आता नोकरी किंवा घरगुती व्यवसाय करू लागल्या आहेत. त्यामुळे मुले घराबाहेर गेल्यानंतर करतात तरी काय ? याचा थांगपत्ता अनेक पालकांना लागत नाही. एखादी घटना घडली आणि कोणी तक्रार घेऊन घरी आले तरच मुलांची भांडणे झाल्याचे पालकांना समजते. विशेषत: माध्यमिक, उच्च माध्यमिकचे शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये हाणामारीचे प्रकार वाढले आहेत.

हाणामारीशिवाय घरफोड्यांसह इतर चोऱ्यांमध्येही लहान मुले आरोपी म्हणून आढळत आहेत. कायद्यानुसार अशा मुलांना न्यायालय बालसुधारगृहात पाठविते. परंतु, बालसुधारगृहातून बाहेर येणारी काही मुले नंतर गुन्हेगारी कृत्य करीत नाहीत. तर काही मुले पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळत असल्याचे पोलिसांसमोर येणाऱ्या काही घटनांवरून दिसून येते. समुपदेशनानंतरही बालगुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांसमोरही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

बालमनावर मोठ्यांच्या चिडचिडेपणाचा परिणाम

आज अनेक मुलं हट्टी होत चालली आहेत. मुलांनी एखादी वस्तू मागितली आणि ती नाही मिळाली तर त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढतो किंवा एखाद्या गोष्टीवरून पालक सतत त्यांना विचारणा करीत असतील तर त्या बालमनावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा, राग वाढू वाढू लागतो. घराबाहेर पडणारी ही मुलं आपल्या रागाच्या भरात भांडण-तंटे करू लागतात. मुलांना अशा कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.

कायद्यातील तरतुदी

एखाद्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलगा, मुलगी आढळून आली तर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करतात. न्यायालयही त्यांची बालसुधारगृहात रवानगी करते. बालसुधारगृहात तज्ज्ञांमाफर्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारी कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात.