शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रोहयोच्या कामावर ६५०० मजूर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:48 AM

प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. मात्र, अद्यापही भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात इतरत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून, प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थिती नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेअतंर्गत कामे देण्यात आली. कामे सुरु झाल्यापासून या कामावर दिवसेंदिवस मजूरांच्या संख्येत वाढ होत होती. मे महिन्याच्या अखेर पर्यंत रोहयोच्या कामावरील मजूरांची संख्या २८ हजारापर्यंत पोहोचली होती. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्याने मजुरांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली. पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडला नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरांना काम मिळावे, म्हणून ग्रामपंचायतीकडून कामांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ७७९ ग्रामपंचायतीपैकी १७६ ग्रामपंचायती अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर ६ हजार ६७१ मजूर कामावर आहे.घनसावंगी तालुक्यातही कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीसह बांधकामे व इतर कामे ठप्प आहेत. तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीपैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक १ हजार ९०८ मजूर कार्यरत आहेत. तर मंठा तालुक्यात सर्वात कमी ८७ मजूर कामावर आहे.शेतीची कामे दिवाळीनंतर आटोपल्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढत असते. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, बोडी, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शौचालय, नाडेप कंपोस्ट, घरकूल, सिंचन विहीर यासह अनेक कामे केली जात असून, या कामावर मजूर कार्यरत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ