शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

युरोपप्रमाणे भारतातही दहशतवादी हल्ले करा, अल-कायदाचं मुस्लिमांना आवाहन

By admin | Updated: July 4, 2016 11:17 IST

ढाकामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या एका दिवसानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतीय मुस्लिमांना देशात युरोपप्रमाणे एकट्याने हल्ला (Lone-Wolf) करण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 04 - ढाकामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या एका दिवसानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतीय मुस्लिमांना देशात युरोपप्रमाणे एकट्याने हल्ला (Lone-Wolf) करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे युरोपात हल्ले करणा-यांनी इसीसपासून प्रभावित होऊन एकट्याने दहशतवादी हल्ले घडवून आणले आहे. इसीस भारतामध्येही अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी लोकांना भडकवत आहे. 
 
'भारतातील मुस्लिमांना आता पुढे आलं पाहिजे, युरोपप्रमाणे भारतातही प्रशासन आणि पोलीस अधिका-यांची हत्या केली पाहिजे', असं भडकाऊ वक्तव्य अल-कायदाचा भारतीय उपखंडातील प्रमुख असीम उमर याने केलं आहे. अल-कायदा गेली 2 वर्ष भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजूनपर्यंत त्यांना हवं तसं यश मिळालेलं नाही. 
 
 
अमेरिकेने नुकतंच भारतीय उपखंडातील अल-कायदा संघटनेला परदेशी दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं असून, असीम उमरचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. अल-कायदा आणि इसीस भारतात हल्ले करण्यासाठी भारतीयांना भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभुमीवर गुप्तचर यंत्रणाही सज्ज झाली आहे. 
 
(ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू)
 
अल-कायदा एकटे हल्ले करण्यासाठी ओळखली जात नाही. मात्र भारतीय उपखंडात इसीसची वाढती लोकप्रियता पाहता अल-कायदा या पर्यायाचा विचार करत असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय उपखंडातील अल-कायदा आणि इसीसमधील शत्रुत्व जगजाहीर आहे. दोन्ही दहशतवादी संघटना उपखंडात मुख्यत: भारत आणि बांगलादेशमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानधील दहशतवादी संघटनांनी याठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. 
 
'अल-कायदा आणि इसीस एकट्याने हल्ला करण्यावर भर देत आहेत. कारण मुख्यत: भारतात त्यांनी हवं तसं जाळ पसरता आलेलं नाही. एकट्याने हल्ला केल्यास त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवणं कठीण होऊन जातं. ज्याप्रमाणे ओरलांडो हल्ल्यात अमेरिकी अधिका-यांनी ओमर मतीनबद्दल काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. भारतीय जर अशाप्रकारच्या हल्ल्यांकडे आकर्षित झाले तर यामुळे खुप मोठा धोका निर्माण होऊ शकतो', असं मत गुप्तचर खात्यातील अधिका-यांनी व्यक्त केलं आहे.