शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पीओकेमध्ये रॅली घेऊन दाखवा, पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:26 IST

कलम ३७० हटल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याचे निमित्त करून पाकिस्तानने काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींनी मुझफ्फराबादमध्ये काश्मिरींसमोर रॅली घेऊन दाखवावीभारताने इम्रान खान यांना श्रीनगरमध्ये येण्याची परवानगी द्यावी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांचे आव्हान

इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्याच्या घटनेला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याचे निमित्त करून पाकिस्तानने गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकव्याप्त काश्मीरची राजधानी असलेल्या मुझफ्फराबाद येथे रॅली घेण्यासाठी निमंत्रित केले आहे. तसेच त्याबदल्यात इम्रान खान यांना श्रीनगरमध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी, असे आव्हान दिले आहे. असे झाल्यास काश्मीरमध्ये कुठल्या नेत्याचे किती स्वागत होते, हे जगाला दिसेल, असे आव्हान त्यांनी दिले आहे.बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, ''मी भारताच्या पंतप्रधानांना अखेरचा संदेश देऊ इच्छितो. आज कलम ३७० रद्द झाल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले. आज पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री या नात्याने मी तुम्हाला निमंत्रण देतो की, तुम्हाला तुमच्या धोरणावर विश्वास असेल तर मुझफ्फराबादमध्ये काश्मिरींसमोर रॅली घेऊन दाखवा, बघुया तुमचे स्वागत कशापद्धतीने होते ते. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर इम्रान खान यांना श्रीनगरला येऊ द्या. मग बघा इम्रान खान यांचे काश्मीरमध्ये कशा पद्धतीने स्वागत होते ते. काश्मीरवरून सार्वमत जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जनतेचे सार्वमत आज होऊन जाईल. हिंमत असेल तर आमचे आव्हान स्वीकारा.''दरम्यान, या विधानानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना ट्विटरवरून जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या राजकारण्यांकडे बडबड करण्याव्यतिरिक्त काही काम राहिलेले नाही. ते लढू शकत नाहीत. तसेच जे हवे आहे ते मिळवू शकत नाहीत. तसेच त्यांच्या दहशतवादामुळे ते भारताला फारसे प्रभावित करू शकले नाहीत.काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान कुठून कुठे पोहोचलाय. कधी सांगायचे की काश्मीरसाठी अणुबॉम्बचा वापर करणार म्हणून. मात्र आता पंतप्रधानांना नियंत्रण रेषेपलीकडे येण्याचं आव्हान देत आहेत. आता पुढच्यावेळी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या मंत्रिमंडळात कब्बडीचा सामना घेण्याचा सल्लापण ते ते देतील, असा टोला एका ट्विटर युझर्सने लगावला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान